20 April 2024 3:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

सांगली-कोल्हापूर पूर | २ दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मोफत अन्नधान्य | फडणवीस सरकारचा तो GR

Devendra Fadnavis, BJP Maharashtra, Sangali Flood, Kolhapur Flood

सांगली, २० ऑक्टोबर : सत्ताधारी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या राज्यात पावसाने केलेल्या नुकसानीवरून वाद सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या उस्मानाबाद येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आज (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला

“राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. सरकारने मदतीबाबत आता कुठलेच बहाणे सांगू नये. मला आश्चर्य वाटतं, या तीन पक्षांमध्ये खूप मतभेद आहेत. पण एका बाबतीत सगळे मात्र एका सूरात बोलतात की, केंद्राने मदत करावी. त्यामुळे हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.यावेळी त्यांनी राज्य सरकावर निशाणा साधला.

मात्र फडणवीस सरकारच्या काळात सांगली-कोल्हापूर पूरस्थिती निर्माण झालेली असताना लोकांच्या मदतीसाठी करण्यात आलेला GR सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतं असून त्यातील अटींबाबत राष्ट्रवादीने देखील त्यावेळी ट्विट केलं होतं. ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे राज्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यात सागंली आणि कोल्हापूरला या पुराचा सर्वात अधिक फटका बसलेला होता. अशातच अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७ ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय काढला होता. मात्र त्या शासन निर्णयाचे निकष पुरग्रस्तांची थट्टा करणारे होते. तो शासन निर्णय समोर आल्यानंतर आता त्यावर चौफेर टीका करण्यात आली होती.

सरसकट सर्वांना मदत करणं अपेक्षित असताना असे जीआर का काढले जात आहेत, असा प्रश्नही त्यावेळी जयंत पाटलांनी विचारला होता. पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा करू नये अशी आमची अपेक्षा आहे. दोन दिवस जमीन पाण्याखाली राहिल्यास शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं शेती करावी लागणार आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सरकारनं वाऱ्यावर सोडलं आहे. लोकांना मदतीचा हात देण्याऐवजी मंत्री सेल्फी काढत फिरत असल्याचं पाहिल्यानंतर मन उद्विग्न होत असल्याची भावनाही जयंत पाटलांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

त्यावेळी फडणवीस सरकारकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला होता. मात्र ती मदत करताना पूरग्रस्तांची थट्टाच जास्त करण्यात आली होती. दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस क्षेत्र पाण्यात बुडालं असेल तरच मोफत अन्नधान्य (१० किलो गहू आणि १० किलो तांदूळ) दिलं जाणार होतं. तसा जीआरच राज्य सरकारकडून काढण्यात आला होता. सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ७ ऑगस्ट रोजी हा जीआर काढला होता.

 

News English Summary: At that time, the Fadnavis government had extended a helping hand to the flood victims. However, the flood victims were mocked while helping her. Free food grains (10 kg wheat and 10 kg rice) would be provided only if the area was submerged for more than two days. As such, the GR was removed by the state government. The GR was issued on August 7 by the government’s Food and Civil Supplies Department.

News English Title: Sangali Kolhapur flood relief old GR of Fadnavis government gone viral News Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x