29 May 2023 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर मजबूत तेजीत, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, परतावा पाहून गुंतवणूक करा ICRA Share Price | ICRA शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार 1300 टक्क्यांचा भरघोस डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या
x

मोदींना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी तो १३५० किमी पायी दिल्लीला

नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडीशाचा दौऱ्यावर आले असता, त्यांनी जनतेला इस्पात जनरल हॉस्पिटलला सुपर स्पेशलिटी करण्याचे व ब्राह्मणी पुल उभा करण्याचे जाहीर आश्वासन दिल होत. मोदींच तेच आश्वासन २०१८ उजाडल तरी प्रत्यक्ष अस्तित्वात न उतरल्याने, त्याची आठवण मोदींना करून देण्यासाठी ३० वर्षीय मुक्तिकांत बिस्वल पायी दिल्लीला पोहोचला.

मुक्तिकांत बिस्वल ओडीशावरून १३५० किमी चक्क पायी चालत दिल्लीला पोहोचला आहे. मोदींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी राऊरकेला येथे मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले होते, त्याचीच आठवण करून देण्यासाठी मुक्तिकांत पायी दिल्लीला पोहोचला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुद्धा त्यालाच अनुसरून काँग्रेस ते आश्वासन पूर्ण करेल असं मुक्तिकांतला ट्विट करत हमी दिली आहे. तसेच संधी मिळताच मोदींना टोला लगावला आहे की, तीन वर्षापूर्वी मोदींनी दिलेलं मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्याचे वचन आणि त्याची आठवण करून देण्यासाठी मुक्तिकांत १३०० किमी चालत दिल्लीला आला आहे…..लोक मरत आहेत.

मुक्तिकांत व्यवसायाने मूर्तिकार असून तो ओडिशाहून दिल्लीला पायी चालत व हातात तिरंगा घेऊन शनिवारी दिल्लीला पोहोचला आहे. परंतु पायी प्रचंड प्रवास करून आल्याने तो आग्रा महामार्गावर बेशुद्ध पडल्याने मुक्तिकांतला इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1663)#Rahul Gandhi(243)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x