महत्वाच्या बातम्या
-
मोदींचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी भाजप नेत्यांनी दिल्लीतून १ कोटी लस आणाव्या - शिवसेना
देशात आणि राज्यात दररोज विक्रमी संख्येनं आढळू येणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला असून, रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र राज्यातील काही शहरांमध्ये दिसत आहे. त्यातच केंद्र आणि महाराष्ट्रात ‘लस’कारणारून जुंपली आहे. महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली असून, राजकारण तापलं आहे. लसीच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपच्या १०५ आमदारांना निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या - संजय राऊत
एक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की हे सगळी लोकं एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहिले आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आता चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व पक्षीय बैठक | लॉकडाऊनची चर्चा?
राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
पहचान कौन? असं ट्विट करणाऱ्या अमृता फडणवीसांना शिवसैनिकाने दिलं असं उत्तर की हसून.....
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच ठाकरे सरकारवर बोचऱ्या टीका करताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर, अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह आणि ठाकरे सरकारवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्याल ही माफक अपेक्षा - राजेश टोपे
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता याला राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार | आरोपीच्या पत्नीला भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट
उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोप कुलदीप सिंह सेंगरची पत्नी संगीता सेंगर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचं अध्यक्षपद होतं. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
4 वर्षांपूर्वी -
सरकार पाडण्यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे - आ. रोहित पवार
देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती दररोज बिघडत आहे. संक्रमितांची प्रकरणे रोज नविन विक्रम बनवत आहेत. गेल्या 24 तासांच्या आत देशात 1 लाख 31 हजार 878 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी व्हायरस आल्यानंतरपासून आतापर्यंतचा हा एका दिवसातील रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी बुधवारी देशात सर्वात जास्त 1 लाख 26 हजार 276 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर | उपमुख्यमंत्र्यांची भाजप नेते आणि मनसेच्या शॅडो मंत्र्यासोबत बैठका | भाजप टेन्शनमध्ये
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना मैदानात उतरवलं. दोन्हीही उमेदवार तगडे असल्याने उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही महाराष्ट्रातील नेते, केंद्राबरोबर भांडू नका पण किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा - जयंत पाटील
भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशात कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. पण आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात साडेपाच दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी पुढील आठवड्यात राज्यांमध्ये कोरोना लशीचे डोस पाठवले जाणार आहेत. अनेक राज्यांनी केंद्राकडे कोरोना लशीची मागणी केली आहे. सध्या देशात 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यात संतापजनक राजकारण | भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक पुरवठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवाकोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे.
4 वर्षांपूर्वी -
रुग्णसंख्या वाढतेय म्हणजे ते राज्य खराब कामगिरी करतंय असं नाही | टेस्टिंग वाढल्याने ते होणारच - पंतप्रधान
कोरोना लसीकरणावरुन महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पुन्हा आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. राज्यात कोरोना व्हॅक्सीनचा तुतवडा असून, पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली होती. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवादानंतर राज्यातील सर्व भाजप नेते तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
माझी कोणतीही चौकशी करायची ती करा | उपमुख्यमंत्र्यांचं खुलं आव्हान
सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावत, या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळली
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर हायकोर्टाने आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणाचा कळस | कोरोना आपत्तीत चंद्रकांतदादांना राष्ट्रपती राजवटीची स्वप्नं | काय म्हणाले?
महाविकासआघाडी प्रत्येक समस्येसाठी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत. त्यांनी राज्य हे केंद्राच्याच ताब्यात देऊन टाकावे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा | पवारांचं जनतेला आवाहन
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. बुधवारी देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी महामारी सुरू झाल्याच्या नंतरपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एका दिवसात एवढे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी 6 एप्रिलला एका दिवसात 1.15 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
देशाच्या इतिहासात सर्वात गलीच्छ राजकारण सध्या महाराष्ट्रातील विरोधक करत आहेत - संजय राऊत
उद्योगपती अंबानी यांनी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पत्रातून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख तसंच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे आज पत्र देणार आणि तिसरी विकेट काढणार हे भाजपला आधीच माहिती होतं - अनिल परब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी -
पवारांची मनधरणीसाठी देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी | वाझेंच्या पत्रात दावा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाझे काम करत होता | भाजपचा खोटेपणा उघडकीस येतोच - सचिन सावंत
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे | पवार ED ऑफिसवर धडकले तर राज इडीला घाबरले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लेखक घनश्याम पाटील यांनी त्यांच्या ब्लॉग मधून काही आरोप केले आहेत. ’जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षका खाली त्यांनी एक ब्लॉग लिहला. या लिखाणामुळे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL