पालघर : पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भाजप शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी दोघे पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत. त्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
भाजपकडून मुंबईतील आमदार मनीषा चौधरी आणि इतर पदाधिकारी यांना जवाबदारी दिल्यानंतर त्यांनी थेट वनगा कुटुंबियांच्या घरी हजेरी लावली होती. काल चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर लगेचच भाजप कडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
तर दुसरीकडे भाजपच्या हालचाली लक्षात घेऊन शिवसेनेने आधीच श्रीनिवास वनगा यांना काल दुपारपासूनच अज्ञात स्थळी हलवलं आहे. एकूणच चिंतामण वनगा यांच्या मृत्यू नंतर सुद्धा वनगा कुटुंबीयांची भाजप शिवसेनेच्या राजकारणात चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र आहे.
