नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवादी जैश-ए-मोहम्मदने गुरुवारी पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ७८ गाड्यांच्या ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केंद्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याविषयी अर्थमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार असून, पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देखील काढून घेतला जाणार आहे. तसेच पाकसोबतचे इतर व्यापारी संबंध तोडण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा निर्धारच या बैठकीत करण्यात आला.

Pulwama terror attack on CRPF and now most favoured nation status which was granted to pakistan stands withdrawn