27 July 2024 7:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

रोज नवे आकडे देणारे मुख्यमंत्री रतन खात्रीकडे कामाला होते का ? राज ठाकरे

सातारा : राज्यातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवनवीन आकडे सांगत असतात त्यामुळे ते आधी रतन खत्रीकडे कडे कामाला होते की काय असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांनी लगावला. सातारा येथे आयोजित कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

सातारा पदाधिकारी मेळाव्यात विरोधकांवर जोरदार फटकेबाजी करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही आपल्या खास ठाकरे शैलीत लक्ष्य केलं. पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना नरेंद्र मोदींची खिल्ली उडवताना म्हणाले की, नरेंद्र मोदींचा हा शेवटचा बजेट आहे आणि तेवढ्या वेळातच आपण आपला हिशोब आटोपून घेऊ असा टोला ही त्यांनी लगावला.

सध्याच्या जातीय वातावरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले आणि आंबेडकरांची नाव घेतलं जात आणि ह्या असल्या पुढाऱ्यांनीच सगळा महाराष्ट्र जातीपातीत अडकवून सगळं वाटोळं केलं आहे असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x