मुंबई : ५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे जाहीर अभिनंदन केले. जनतेने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले असे सुद्धा ते म्हणाले, तसेच नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यामुळेच नरेंद्र मोदींबद्दल असलेली प्रचंड नाराजी मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्वायत्त संस्थावर केलेला हल्ला सुद्धा लोकांच्या पचनी पडलेला नाही असं ते निकालाअंती म्हणाले.
मोदी सरकारने RBIला सुद्धा सोडले नाही. त्यामुळे देशभरात सध्या काळजी करण्यासारखे वातावरण पाहायला मिळत आहे. यासाठीच बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने सत्तास्थापनेसाठी राष्ट्रीय कॉंग्रेसला साथ द्यावी अशी अपेक्षा एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
Congratulations to @INCIndia for their resounding success in Chhattisgarh, Rajasthan and Madhya Pradesh assembly elections. These results clearly indicate that people do not believe in the communal forces, what they really want is peace and progress.#CongressWinsBig
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 11, 2018
