डोंबिवली : भाजप शिवसेनेशी जवळीक साधण्याचा जो प्रयत्नं करत आहे त्यावर सुद्धा खोचक टिपणी करताना संजय राऊत म्हणाले की, आता भाजपने आमचा मुका घेतला तरी युती शक्य नाही अशी तिखट शब्दात टीका केली.

आम्ही कोणत्याही परिस्थिती भाजप सोबत पुन्हा जाणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना सत्तेत केवळ ‘टेकूधारी’ पक्ष म्हणून आहे असं हि विधान केलं.

काही दिवसांपुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे आपण पाहिलेल्या गलिच्छ शहरांपैकी एक शहर आहे अशी टिपणी केली होती. त्यालाच उत्तर देताना संजय म्हणाले की, डोंबिवली पेक्षा वाराणसीची अवस्था अधिक वाईट आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ आहे त्यामुळे संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावला.

डोंबिवलीत एक कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या विषयांवर टिपणी केली.

shivsena sanjay raut criticised on bjp government