26 April 2024 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

नागपूरमध्ये पावसाने केली सरकारची नाचक्की

सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळाचा आजचा तिसरा दिवस असून वीजपुरवठा खंडित असल्या कारणाने आजचा विधिमंडळाचा दिवस वाया गेल्याची चिन्ह आहेत. काल रात्रीपासूनच्या सततच्या पावसाने शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी साठले आहे आणि याच कारणाने शहरात बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

विधिमंडळाच्या तळघरात पाणी शिरल्याने विधिमंडळाचा देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अर्थातच अंधारात काम करणे शक्य नसल्याने विधिमंडळाचे कामकाज आज बंद करण्यात आले. वीजपुरवठा नसल्याने कामकाज बंद पडण्याची हि पहिलीच वेळ असल्याने सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे असा सूर विरोधकांनी लावला.

विधिमंडळात येताना आज सर्वच आमदारांची चांगलीच तारांबळ उडाली आणि सर्व आमदारांना अंधारातच बसावं लागलं. नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या शिवसेना आमदारांना देखील मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात घोषणा बाजी करावी लागली. केवळ सरकारने हट्टापायी सगळी यंत्रणा नागपूर अधिवेशनात लावली उलट हे अधिवेशन नागपुरात केलं तर थोड्याच पावसाने विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होईल असं एका अहवालात सांगण्यात आलं होत, अशी माहिती विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. जर हे अधिवेशन मुंबईमध्ये केलं असतं तर मुंबईतील सुसज्ज यंत्रणेमुळे सरकारवर हि नामुष्की ओढवली नसती असे मत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी व्यक्त केले.

अर्थातच काय जिकडे सरकार एवढी सुसज्ज यंत्रणा घेऊन तोंडघशी पडली तिथे सर्वसामान्य माणसाचे होणारे रोजचे हाल आणि पावसामुळे प्रवासात होणारा त्रास हे सरकार कधी समजेल एवढीच आशा.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x