मुंबई : मानवी तस्करीचे आरोप असून सुद्धा केवळ भाजपमध्ये असल्याने विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड पावन झाले का? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आमदार प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
प्रसाद लाड हे सध्या भाजपचे विधानसभेचे आमदार असून त्याच्या मालकीची क्रिस्टल कंपनी सध्या मानवी तस्करीचे आरोप असून त्याची जोरदार राजकीय चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रसाद लाड यांचावर ट्विट करून निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पारदर्शक कारभाराबद्दल प्रश्न विचारले आहेत. मानवी तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या प्रसाद यांच्यावर कारवाई होत नाही कारण ते भाजपचे आमदार आहेत असा अप्रत्यक्ष आरोप करत मुख्यमंत्री आणि पंतप्रधांना ट्विट करत प्रश्न विचारले आहेत.
.@sureshpprabhu BCAS ने स्पष्टपणे सांगितलेय की क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस ही प्रसाद लाड यांची कंपनी मानवी तस्करीच्या प्रकरणात गुंतलीय. एवढा गंभीर आरोप देखील भाजपमध्ये पावन झाला का @narendramodi जी, @Dev_Fadnavis जी हे सर्व तुमच्या डोळ्यादेखत होतेय.हाच का तुमचा पारदर्शक कारभार ?
— Supriya Sule (@supriya_sule) April 27, 2018
खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रसाद लाड यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की,’ शरद पवार साहेब मला नेहमी सांगायचे की आरोप झाले म्हणजे माणूस मोठा होतो’. परंतु सुप्रिया ताईंनी असं ट्विट केल्यामुळे आता माझा राजकीय भाव वाढला असून राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे असं ते म्हणाले.
तसेच प्रतिउत्तर देताना प्रसाद लाड पुढे म्हणाले की ‘मी राष्ट्रवादीमध्ये असल्यापासून बिझनेसमध्ये होतो. त्यामुळे ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी शहानिशा करणं अपेक्षित होतं.
