नवी दिल्ली : यापुढे तिहेरी तलाक घेतल्यास महिलेचा पती गुन्हेगार ठरणार आहे. कारण, तिहेरी तलाकबंदी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. त्यात विशेष भर म्हणजे काँग्रेसने विरोध केलेल्या ‘गुन्हेगारी’ या शब्दासह केंद्राने हा अध्यादेश काढला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयक आणले नसून, केवळ राजकीय फायदा घेण्यासाठीच भाजपने हा घाट घातला आहे असा थेट आरोप काँग्रेस आरोप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केला.

यापूर्वी पावसाळी अधिवेशनात म्हणजे गेल्या महिन्यात तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत एकमत न झाल्याने या विधेयकाला मंजुरी मिळाली नव्हती. तरी हे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले होते. मुस्लिम समाजातील प्रतेनुसार तिहेरी तलाक हा पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तोंडी बोलले जाते. यामध्ये ३ वेळा तलाक असे म्हटले जाते. त्यामुळे मुस्लिम महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संघटनांनी ही प्रथा बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात एक महिलेने याविरोधात याचिका दाखल केली होती. यानंतर केंद्र सरकराने हे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला होता.

union cabinet approves triple talaq ordinance