रत्नागिरी : नाणार रिफायनरी संदर्भात केंद्र सरकारने नुकताच करार केला असून त्याला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी ‘केंद्राने नाणार संदर्भात कितीही करार करावेत प्रकल्प सुरु होणार नाही’ असा सज्जड दम भरला आहे.

मी स्वतः कोकणचा भूमिपूत्र आहे आणि मला कोकणी माणसाने अपार प्रेम दिले आहे जे मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे मी कोकणी जनतेच्या हितासाठी वाट्टेल तो त्याग करायला तयार आहे. जर वेळ पडली तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामाही फेकून देईन असा इशाराच नारायण राणे यांनी सरकारला दिला आहे.

तसेच शिवसेना ही नाणार बाबतची भूमिका ही दुपट्टी असल्याचा आरोप सुद्धा नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे. मी शिवसेनेसारख्या राजीनामे खिशात घेऊन फिरणार नाही आणि वेळ पडली तर माझ्या कोकणी जनतेच्या हितासाठी मी खासदारकीचा तडकाफडकी राजीनामाही देईन असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात नाणार रिफायनरीच्या प्रकल्पावरून कोकणातील वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.

We will never accept Nanar Project in Konkan and I will resign too if it will forcefully impose by government