पुणे : आयुष्याच्या प्रवासात नियती कोणता खेळ खेळेल ते सांगता येणे कठीण आहे आणि तसाच काहीसा प्रकार पुणे येथील भीषण अपघातात घडला आहे. पुणे-सोलापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात तब्बल ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ – १५ च्या १०वी’च्या बॅचमध्ये एकत्र शिकत होते. विशेष म्हणजे हे सर्व जण पहिल्या इयत्तेपासून जिवलग वर्ग मित्र होते.
काल सकाळी आठ वाजता ते रायगड येथे वर्षाविहारासाठी गेले होते. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडून यवतकडे येत होते. त्यावेळी वेगामुळे अथवा चालकाला डुलकी लागल्यामुळे त्यांच्या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्यात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमधील आठ जण यवत मधील तर एक जण कासुर्डी येथील आहे.
दरम्यान, या अपघातात अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज यांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra: 9 people, in a car, died in a collision with a truck on Pune-Solapur highway near Kadamwak Wasti village in Pune, late last night. All the deceased were residents of Yavat village of Pune. pic.twitter.com/CVihgprc92
— ANI (@ANI) July 19, 2019
