सिडनी : भारत विरुद्ध कांगारूंच्या चौथ्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका भारतीय टीमने जळपास जिंकली आहे. दरम्यान, या गोष्टीवर उद्या शिक्कामोर्तब होईल. परंतु, ते होण्यापूर्वी विराटसेनेने रविवारीच कांगारुंची लक्तर वेशीवर टांगली आहेत.

दरम्यान, वरुण राजाने विजयात वारंवार अडथळे आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय क्रिकेट संघाने पूर्णपणे वर्चस्व प्राप्त केले आहे. कुलदीप यादवने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने कांगारूंचा पहिला डाव ३०० धावांवर गुंडाळला होता. तसेच पहिल्या कसोटीत ३२२ धावांची आघाडी घेत भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले आहे.

IND Vs Aus has stopped the day 4 game due to rain