AI Job Loss crisis | आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानामुळे क्लेरिकल कामात घट झाली आहे, तसेच तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा तज्ञांची वाढती मागणी यामुळे जागतिक आणि भारतीय श्रम क्षेत्र अस्थिरतेच्या नव्या युगाकडे वाटचाल करीत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, एआय, डिजिटायझेशनमुळे पुढील पाच वर्षांत सुमारे एक चतुर्थांश नोकऱ्या बदलतील.
२३ टक्के कामगार क्षेत्रावर परिणाम होणार :
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फ्यूचर ऑफ जॉब्स २०२३ च्या अहवालानुसार पुढील पाच वर्षांत जागतिक कामगार बाजाराच्या २३ टक्के भागावर परिणाम होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे लिपिकांचे काम कमी होण्यास सुरुवात होईल, तसेच तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मागणी वाढेल.
८.३ कोटी नोकऱ्या जातील :
अहवालानुसार AI मुळे, जगभरात 8.3 कोटी नोकऱ्या जातील, तर दुसऱ्या बाजूला 6.9 कोटी रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे येत्या पाच वर्षांत १५.२ कोटी नोकऱ्या प्रचंड अडचणीत येणार आहेत.
एआय सर्वात मोठा अडथळा:
चॅटजीपीटीसारखे एआय अ ॅप्स लॉजिक, कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन सारख्या भूमिकांसह अनेक नोकऱ्या काढून टाकण्यात आणि स्वयंचलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे अहवालात म्हटले आहे.
जगातील ७५ टक्के कंपन्यांनी पुढील पाच वर्षांत एआय चा अवलंब करणार असल्याचे सांगितले. यामुळे कॅशियर, तिकीट क्लार्क, डेटा एन्ट्री आणि अकाऊंटिंग सारख्या नोकऱ्यांसह रेकॉर्ड कीपिंग आणि प्रशासकीय पदांवरील 2.6 कोटी नोकऱ्या संपुष्टात येतील.
भारतातही असाच बदल अपेक्षित
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आणि डेटा सेगमेंटसारख्या उदयोन्मुख भूमिकांमुळे भारतीय जॉब मार्केटमध्ये पुढील पाच वर्षांत २२ टक्के उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ६१ टक्के कंपन्यांना असे वाटते की ईएसजी (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) मानकांचा व्यापक वापर केल्यास नोकऱ्या वाढतील, त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब (५९ टक्के) आणि डिजिटल प्रवेश (५५ टक्के) होईल. एआय आणि मशीन लर्निंग तज्ञ, डेटा अॅनालिटिक्स आणि शास्त्रज्ञ भारतातील उद्योग परिवर्तनात मोठी भूमिका बजावतील.
अशी असेल क्षेत्रनिहाय स्थिती
एआय, मशीन लर्निंग, सस्टेनेबिलिटी, बिझनेस इंटेलिजन्स अशा क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी जास्त असेल. तर मागणीत सर्वात मोठी घट बँक क्लार्क, पोस्टल क्लर्क, कॅशियर, तिकीट लिपिक आदींसाठी होणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: AI Job Loss crisis in India check details on 03 May 2023.
