नांदेड : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि बेळगांव प्रश्नि ते महाराष्ट्रचे समन्वय मंत्री असून सुध्दा बेळगाव मध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गाण्याचा प्रकार चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि चंद्रकांत पाटलांचा निषेध ही नोंदविला.
सध्या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची हल्लाबोल यात्रा चालू आहे त्यावेळी नांदेड येथील एका सभेत त्यांनी हे मत व्यक्तं केलं.
पुढे अजित पवार असेही म्हणाले कि महाराष्ट्रातील मंत्र्यांनी इतर राज्यात जरूर जावे परंतु महाराष्ट्र राज्याची अस्मिता ही जरूर पाळावी असे नमूद केले.
कर्नाटक राज्यात मराठी भाषिक लोकांना वाईट वागणूक मिळते. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री @ChDadaPatil यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये गीत गाणे अयोग्य आहे. त्यांच्या अशा वागण्याचा धिक्कार. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. #हल्लाबोल @NCPspeaks pic.twitter.com/btnspOA8pU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 21, 2018
