2 May 2025 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

Sarkari Naukri | 8 वर्षात मोदी सरकारने 7.22 लाख लोकांना दिली नोकरी, तर 2024 निवडणुकीपूर्वी 10 लाख नोकऱ्यांचं गाजर

Sarkari Naukri

Sarkari Naukri | मोदी सरकारच्या विविध विभागांनी गेल्या आठ वर्षांत देशभरात ७ लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली. या आठ वर्षांच्या काळात केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 22.05 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहितीही सरकारने दिली.

2021-22 या वर्षात 38,850 जणांची भरती :
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २०१४-१५ ते २०२१-२२ या कालावधीत ७ लाख २२ हजार ३११ जणांची भरती करण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. यापैकी 2021-22 या वर्षात 38,850 जणांची भरती करण्यात आली होती, तर या कालावधीत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 18.6 कोटींपेक्षा जास्त होती. यापूर्वी 2020-21 मध्ये 78,555 आणि 2019-20 मध्ये 1,47,096 लोकांची भरती करण्यात आली होती.

एकूण २२ कोटी ५ लाख ९९ हजार २३८ अर्ज आले होते :
या आठ वर्षांत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी एकूण २२ कोटी ५ लाख ९९ हजार २३८ अर्ज आले होते, अशी माहितीही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मोदी सरकार देशात रोजगार वाढवण्यावर खूप भर देत असल्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला. त्यासाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याबरोबरच युवकांची पात्रता वाढविण्याचे काम केले जात आहे.

२०२४ पूर्वी सुमारे १० लाख लोकांना रोजगार देणार :
यापूर्वी जितेंद्र सिंह यांनी बुधवारी, २० जुलै २०२२ रोजी लोकसभेत लेखी उत्तर देताना केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये १ मार्च २०२२ पर्यंत ९ लाख ७९ हजार पदे रिक्त असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०२२ मध्ये म्हटले होते की त्यांचे सरकार २०२४ पूर्वी विविध सरकारी विभागांमध्ये सुमारे १० लाख लोकांना रोजगार देईल.

आणखी एका लेखी उत्तरात म्हटलं :
जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या आणखी एका लेखी उत्तरात म्हटलं आहे की, केंद्र सरकारमध्ये भरतीची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्यासाठी संबंधित मंत्रालये आणि विभाग जबाबदार आहेत. निवृत्ती, बढती, राजीनामा, कर्मचाऱ्यांचा मृत्यू अशा कारणांमुळे सरकारी विभागातील पदे सातत्याने रिक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri Modi Government gave 7. 22 Lakh Naukri in 8 years from 22 Crore Applicants check details 17 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या