Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर हिंसाचारात लाखो घर-संसार उध्वस्त, मुलांच्या शाळाही जळून राख, महिलांचा रोष रस्त्यावर

Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर हिंसाचारात लाखो घर-संसार उध्वस्त आली असून मुलांच्या शाळाही जळून राख झाल्याने महिलांचा रोष आता रस्त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी दिसत नसल्याने सर्व रोष सुरक्षा यंत्रणांवर व्यक्त होतं असल्याने परिस्थती अजून गंभीर होऊ लागली आहे. विशेष म्हणजे मागील ५० दिवस संपूर्ण राज्य दंगल आणि हिंसाचाराने जळत असताना देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्द काढलेला नसल्याने भाजप विरोधात रोष विकोपाला पोहोचल्याच स्थानिक वृत्त वाहिन्या सांगत आहेत.
गेल्या ५० दिवसांपासून जातीय हिंसाचाराच्या विळख्यात सापडलेल्या मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करून १२ जणांची सुटका केली. महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५०० जणांच्या जमावाने घेराव घातला आणि शोधमोहीम उधळून लावल्यानंतर अटक करण्यात आलेल्या १२ कांगलेई यावल कन्ना लुप (केवायकेएल) दहशतवाद्यांना तेथून जाण्यास भाग पाडण्यात आले, अशी माहिती सुरक्षा दलांनी शनिवारी दिली. या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
लष्कराच्या प्रवक्त्यानेही या घटनेला दुजोरा देत सांगितले की, दिवसभरात लष्कराने शोध मोहिमेचा एक भाग म्हणून केवायकेएलच्या १२ सदस्यांना अटक केली होती, ज्यात २०१५ च्या घातपाताचा मास्टरमाइंड मोइरंगथेम तांबा ऊर्फ उत्तम चा समावेश होता. मात्र येथे लोकांच्या जगण्याचा मार्गच उध्वस्त झाल्याने लोकांनी शस्त्र हातात घेण्यास सुरुवात केली आहे.
दुपारी अडीचच्या सुमारास गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्वेकडील इथाम गावात कारवाई सुरू केली. या कारवाईचा एक भाग म्हणून गावाला घेराव घालण्यात आला, ज्यामध्ये केवायकेएलच्या 12 कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्रे, दारुगोळ्यासह पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या १२ जणांपैकी २०१५ च्या डोगरा हल्ल्याचा सूत्रधार स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल मोइरांगथेम तांबा ऊर्फ उत्तम याची ओळख पटली आहे.
काही वेळाने महिला आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १२०० ते १५०० जणांच्या जमावाने तातडीने ज्या भागात ही कारवाई करण्यात आली त्या भागाला घेराव घातला आणि सुरक्षा दलांची कारवाई पुढे जाण्यापासून रोखण्यात आली, असे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. महिलांच्या आक्रमक जमावाला सुरक्षा दलांना कायद्यानुसार कारवाई सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे वारंवार आवाहन करण्यात आले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. महिलांची आक्रमकता आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन केवायकेएलच्या १२ कार्यकर्त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, सुरक्षा दलांनी जप्त केलेली स्फोटके आणि इतर शस्त्रे जप्त केली.
महिलांच्या नेतृत्वाखाली जमावाने सुरक्षा दलांना शोधमोहीम राबवण्यापासून रोखल्याचा मुद्दा संपूर्ण मणिपूरमध्ये गाजत आहे. २२ जून रोजी महिला आंदोलकांच्या नेतृत्वाखाली जमावाने शस्त्रांच्या लूटमारीचा तपास करण्यासाठी मणिपूर पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या सीबीआयच्या पथकाला पुढे जाण्यापासून रोखले होते. २३ जून रोजी लष्कराने ट्विट केले होते की, महिलांच्या नेतृत्वाखाली जमावाने सुरक्षा रक्षकांना त्या भागात पोहोचण्यापासून रोखले जेथे सशस्त्र गुंड स्वयंचलित बंदुकीने गोळीबार करत होते.
३ मेपासून मेइतेई आणि कुकी समुदायात झालेल्या जातीय हिंसाचारात ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर ३ मे रोजी प्रथमच दोन्ही समाजात संघर्ष झाला होता. यानंतर लगेचच राज्यात जातीय हिंसाचार उसळला आणि हजारो घरांना आग लावण्यात आली. हिंसाचारामुळे लाखो लोक विस्थापित झाले असून शेजारच्या राज्यात पळून गेले आहेत.
News Title : Manipur Violence mob led by group of women attacked on security forces check details on 25 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL