3 May 2025 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Rahul Gandhi in Manipur | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर प्रशासनाने राहुल गांधी यांचा ताफा रोखला, जनतेची समर्थनार्थ घोषणाबाजी

Rahul Gandhi in Manipur

Rahul Gandhi in Manipur | मणिपूरमध्ये ३ मेपासून जातीय संघर्ष सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. २९ आणि ३० जून रोजी ते मणिपूरमध्ये राहणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये फिरकले नसून, भाजपाची सत्ता असूनही मोदी सरकार हिसाचार थांबविण्यात नापास झाले आहेत. दरम्यान, हिंसाचार सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांची ही पहिलीच मणिपूर भेट आहे.

दरम्यान, भाजपाची सत्ता असलेल्या प्रशासनाकडून राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूरजवळ रोखण्यात आला, त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी इम्फाळ आणि चुराचंदपूर मध्ये ते हिंसाचारात बळी गेलेल्या लोकांना भेटणार आहेत आणि मदत शिबिरांना ही भेट देतील. मणिपूरमधील हिंसाचार आणि संकटासाठी काँग्रेसने भाजपला जबाबदार धरले आहे.

राहुल गांधींचा ताफा का रोखण्यात आला हे स्पष्ट करताना बिष्णुपूरचे एसपी हेस्नाम बलराम सिंह म्हणाले की, “जमीनी परिस्थिती पाहून आम्ही त्यांना (राहुल गांधी) पुढे जाण्यापासून रोखले आणि त्यांना हेलिकॉप्टरने चुराचंदपूरला जाण्याचा सल्ला दिला. राहुल गांधी ज्या महामार्गावरून जात आहेत, त्या महामार्गावर ग्रेनेड हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही त्यांना परवानगी दिलेली नाही असं सांगण्यात आले आहे.

मणिपूरमधील बिष्णुपूरजवळ राहुल गांधी यांच्या ताफ्याला पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसने गुरुवारी सरकारवर निशाणा साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय हिंसाचारग्रस्तांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा वापर केल्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सरकारची ही कृती पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि सर्व घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करते. मणिपूरमध्ये राहुल गांधी यांच्या ताफ्याला बिष्णुपूरजवळ पोलिसांनी अडवले आहे, असे खर्गे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंसाचारग्रस्त भेटण्यासाठी आणि संघर्षग्रस्त राज्याला दिलासा देण्यासाठी मदत छावण्यांना भेट देत आहेत.

पंतप्रधान मोदींनी मणिपूरबाबत मौन तोडण्याची तसदी घेतलेली नाही. त्यांनी हे राज्य स्वत:च्या नशिबावर सोडले आहे. आता त्यांची दुटप्पी सरकारे राहुल गांधींची पोहोच रोखण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा अवलंब करत आहेत. हे पूर्णपणे अमान्य आहे. मणिपूरला संघर्षाची नाही तर शांततेची गरज आहे असं खर्गे म्हणाले.

News Title : Rahul Gandhi in Manipur for 2 days check details on 29 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi in Manipur(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या