3 May 2025 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

एक राज्य 3 महिने जळतंय, महिला-मुलांना ठार केलं जातंय, यावर संसदेत देशाचे पंतप्रधान 2 तास हसत-विनोद करत कसे भाषण करू शकतात? - राहुल गांधी

Rahul Gandhi

Rahul Gandhi | एनडीए सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत असताना संसदेत हसणे मला शोभत नाही. मणिपूरमधील परिस्थितीवर संसदेत अविश्वास ठरावाचा निकाल पार पडल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, पंतप्रधानांनी लोकसभेत दोन तासांहून अधिक काळ केलेल्या भाषणात मणिपूरवर केवळ दोन मिनिटे भाषण केले आणि या भाषणात ते हसत-विनोद करत बोलत होते हे क्लेशदायक आहे असं त्यांनी म्हटलं.

काल पंतप्रधानांनी लोकसभेत दोन तास १३ मिनिटांचे भाषण केले, पण मणिपूरवर केवळ दोन मिनिटे बोलले. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आग लागली आहे, लोक मारले जात आहेत, बलात्कार केले जात आहेत, लहान मुले मारली जात आहेत आणि पंतप्रधान हसत बोलत होते. ते अनेकदा हसत होते. ते गंमत देखील करत होते. हे भारताच्या पंतप्रधानांना शोभत नाही. मुद्दा काँग्रेस किंवा माझा नव्हता, मुद्दा होता मणिपूरमध्ये काय चालले आहे? आणि ते का थांबवले जात नाही?

पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विजू नये अशीच त्यांची इच्छा होती

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली, हे त्यांनी सभागृहात केलेले वक्तव्य केवळ पोकळ शब्द नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले. मणिपूरमध्ये भाजपने हिंदुस्थानची हत्या केली आहे. पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विजू नये अशीच त्यांची इच्छा होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भारतीय लष्करावर मला विश्वास आहे आणि लष्कर दोन-तीन दिवसांत शांतता प्रस्थापित करू शकते, पण मोदी सरकारला ते करायचे नाही असं देखील त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मी जवळपास 19 वर्षांपासून राजकारणात आहे आणि मी जवळजवळ सर्व राज्यांना भेटी दिल्या आहेत, परंतु मणिपूरमध्ये मी जे पाहिले आणि ऐकले ते अभूतपूर्व आहे. भारताचे पंतप्रधान मणिपूरबद्दल संसदेत जसे बोलले तसे कसे बोलू शकतात हे मला समजत नाही.

संसदेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून पहिल्यांदाच ‘भारतमाता’ हा शब्द काढून टाकण्यात आला

मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आग लागली आहे आणि तेथील लोकांचा मृत्यू झाला आहे, याचा पंतप्रधानांना विसर पडलेला दिसतो. संसदेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून पहिल्यांदाच ‘भारतमाता’ हा शब्द काढून टाकण्यात आला, हा अपमान आहे, असेही काँग्रेस खासदार म्हणाले. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत म्हटले की, त्यांनी भारत मातेचा उल्लेख केला होता, जो नंतर संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला.

त्या राज्यात फूट पडली

मणिपूरमध्ये कुकी लोकं मैतेई लोकांना बघताच गोळी घालत आहेत, तर मैतेई लोकं कुकी लोकांना बघताच गोळी घालत आहेत. या हिंसाचाराने मणिपूरचे दोन तुकडे झाले आहेत आणि त्या राज्यात फूट पडली आहे आणि त्यामुळेच मी म्हणालो की मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या करण्यात आली आहे आणि आपल्या एकतेची देखील हत्या झाली आहे, असे ते म्हणाले. कारण आम्हाला माहित असलेले मणिपूर आता अस्तित्वात नाही.

भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास

‘भारतमाते’वर जिथे आणि जेव्हा हल्ला होईल, तेव्हा तुम्हाला मी तिथे उभा दिसेन. माझा भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे, सर्वांना माहित आहे की, विचारताच मणिपूरमधील हिंसाचार त्याच वेळी थांबवू शकतो, पण सरकार तसे करत नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना मणिपूरला भेट देण्याचे आवाहन केले. मणिपूरमधील हिंसाचार पंतप्रधान ताबडतोब थांबवू शकतात, पण ते तसे करत नाहीत; त्यांनी निदान तिथे तरी जायला हवं.

News Title : Rahul Gandhi Press conference says on Manipur 11 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या