29 April 2024 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आदित्य ठाकरेंकडे 'जन आशीर्वाद' यात्रेसाठी वेळ; पण तिवरे धरणातील बाधितांना भेटण्यास वेळ नाही?

Aaditya Thackeray, Aditya Thackeray, Uddhav Thackeray, Shivsena, Yuvasena, Tiware Dam Incident

मुंबई: चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता. मात्र सत्तेत विराजमान असून आणि स्वतःला कोकणचे कैवारी समजणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येथे फिरकलेच नाहीत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून थेट सत्तेत महत्वाच्या पदावर विराजमान करण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शहं देण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून एकप्रकारे आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात सत्तेत विराजमान करण्याच्या योजना शिवसेनेने आखल्या आहेत.

दरम्यान फडणवीसांची ‘विकास यात्रा’ १ ऑगस्टपासून काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती आणि कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी तसेच ५ वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच घाईघाईत आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात करतील. येत्या शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या यात्रेला सुरुवात होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगलं मतदान झाल्याने मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं शिवसेनेकडे वळवण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार असल्याचे समजते. सध्या शिवसेना, भारतीय जनता पक्षामध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. परंतु तरी देखील शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाच्या मनस्थितीत नाही. २०१४चा अनुभव गाठीशी असल्याने आणि भाजपावर पूर्ण विश्वास नसल्याने भाजप थेट निवडणुकीच्या वेळी युती तोडूदेखील शकतो हे माहित असल्याने शिवसेना हा धोका टाळण्यासाठी कामाला लागली आहे.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर ‘आशीर्वाद यात्रा’ काढायला वेळ आहे, मात्र अनेक निरपराधांचे बळी जाऊन देखील उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे येथे फिरकले देखील नाहीत आणि त्यामुळे समाज माध्यमांवर आत्तापासूनच त्यांच्या या यात्रेवर टीका करण्यात येते आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x