6 May 2024 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

ईव्हीएम'विरोधात एल्गार! २१ ऑगस्टला विरोधकांचा मोर्चा

MNS, Raj Thackeray, NCP, Ajit Pawar, Congress, Balasaheb Thorat, Shekap, Jayant Patil, Swabhimani Shetkari Sanghatana, Former MP Raju Shetty

मुंबई : निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेलाही या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला बहुमताने निवडून येण्याचा आत्मविश्वास आहे मग त्यासाठी ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची गरज नाही. त्यामुळे मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी या दोन्ही पक्षांनी मोर्च्यात सहभागी व्हावे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तसेच ज्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेवरून गोंधळ सुरू आहे, अमेरिका स्वत: ईव्हीएमवर मतदान घेत नाही त्या अमेरिकेत आपल्या मतदानाच्या ईव्हीएमचे चीप बनणार असेल, तर लोकांनी विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही ‘ईव्हीएमद्वारे मतदान हवे की मतपत्रिकांद्वारे’ हे जनतेकडूनच जाणून घेणार आहोत, त्यासाठी घराघरांत फॉर्म वाटले जातील. लोकांची मते घेतली जातील, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख आजच्या बैठकीला उपस्थित होते. पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आम्ही एक फॉर्म काढून ते लोकांकडून भरुन घेणार आहोत. निवडणुका बॅलेटपेपर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय कार्यकर्ते लोकांकडून भरुन घेतील. २१ तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अमेरिकेत ईव्हीएम मशीनची चीप बनत असेल तर त्यावर भारतीयांनी विश्वास कसा ठेवायचा? ३७१ मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत घोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी १ लाख मतदान झाली आहे तिथे १ लाख १५ हजार मते दाखविली जात आहेत. राजू शेट्टी असे नेते आहेत ज्यांना लोकं पैसे गोळा करुन निवडणुकीसाठी मतदान करतात मग त्यांना मते मिळू शकत नाही का असा सवाल करत विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्यास ही शंका दूर होण्यास मदत मिळेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा’ या बॅनरखाली ही पत्रकार परिषद घेण्यात आली. राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच विरोधकांची भूमिका मांडून पुढील आंदोलनाची माहिती दिली. २१ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चाच्या आधी जनतेकडून एक विशिष्ट फॉर्म भरून घेतला जाणार आहे. ईव्हीएममधील त्रुटींबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्याद्वारे लोकांचंही मत विचारात घेतलं जाणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x