3 May 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

अलमट्टी धरण: २००५ मध्ये आबां'नी जे धाडस दाखवलं ते फडवीसांना जमलंच नाही, अन्यथा?

karnataka, Almatti Dam, R R Patil, Sangali Flood, Kolhapur Flood

कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, साताऱ्यातील गंभीर पूरपरिस्‍थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी संपर्क साधला आहे. येडियुरप्पा यांनी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाच लाख क्‍युसेक्‍स पाणी सोडून देण्याचे मान्य केले असून, यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्‍थिती आटोक्‍यात येण्यास मदत होणार आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. हे धरण भरले असल्याने बॅकवॉटरचा फटका कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना बसत आहे. असं असलं तरी देवेंद्र फडणवीसांकडून या परिस्थीतीकडे लक्ष जाण्यास महाजानदेश यात्रेमुळे खूपच उशीर झाल्याचं म्हटलं जातं आहे.

कर्नाटकातील सरकार पडताना महाराष्ट्रातील मंत्री जसे पहिल्या मिनिटांपासून कर्नाटकातील नेत्यांच्या संपर्कात होते तसे ते सांगली कोल्हापूरमधील पूर आपत्तीच्यावेळी नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळेच वेळीच उपाय योजना न झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. याच मूळ कारण म्हणजे कर्नाटकातील अलमट्टी धरण हे सांगलीपासून केवळ २०० किलो मीटरवर तर कोल्हापूरपासून २५० किलोमीटरवर आहे.

सन २००५ साली सांगलीत असाच महापूर आला होता त्यावेळी, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबांनी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला पुढे जाण्यासाठी जर वाट नाही करून दिली तर, आम्ही आमच्या राज्यातल्या धरणाचे सर्व दरवाजे उघडून सर्व पाणी कर्नाटकात घुसवू असा थेट इशाराच कर्नाटक सरकारला दिली होता. त्यावेळी तत्कालीन कर्नाटक सरकारने देखील त्याची दखल घेत, अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली आणि काही काळातच सांगलीतले जनजीवन पूर्ववत झाले होते. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी देखील योग्यवेळीच अशी भूमिका घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं होतं.

दुसरी गोष्ट म्हणजे, कुठलेही धरण हे जोपर्यंत १०० टक्के भरत नाही तोपर्यंत त्यातून पाणी सोडूच नये हि आपलपोटी, स्वार्थी प्रवृत्ती हि यासाठी जबाबदार आहे. धरणे ज्यावेळी ७० टक्के भरली त्याचवेळी त्यातून विसर्ग सुरु केला पाहिजे जेणेकरून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी वेळ मिळेल आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही. विद्यमान सरकारने योग्य वेळी पावलं ओळखली असती तर सांगलीच्या पूरपरिस्थितीत १६ जणांवर मृत पावण्याची वेळच आली नसती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या