पुणे: राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळविले त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. विरोधी पक्षातील भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालात का? असा सवाल केला आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातील त्यांचे निवासस्थान समता भूमीवर जाऊन क्रांतिज्योतींना अभिवादन केले. यावेळी पुण्याचे प्रथम नागरिक असलेले महापौर मा. @mohol_murlidhar उपस्थित होते.#SavitribaiPhule pic.twitter.com/GU5hEIsaLk
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 3, 2020
‘साखरे संदर्भातील एका कार्यक्रमात हे म्हणतात की, साखरेचा विषय आला की मी जयंत पाटलांकडे पाहतो. महसूलचा विषय आला की मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता. केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का आणि राज्याला असा मुख्यमंत्री चालणार आहे का,’अशी बोचरी टीका करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
तसेच अवेळी पावसाच्यावेळी ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, बांध काय आहे हे तुम्हाला कळतं नाही, एकर, हेक्टर याचा फरक माहित नाही. हेक्टर म्हणजे काय? एका हेक्टरमध्ये किती एकर, एक एकरात किती गुंठे अन् एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा असते हे पहिलं सांगा. एमएसपी, एफआरपी हे सुद्धा कळत नाही. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे माहिती नाही असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला.
दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पद घेतले नाही. त्यांनी ठरविले असते तर ते राष्ट्रपतीसुद्धा झाले असते. मात्र, त्यात शान होती. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना थोडे प्रशिक्षण घेऊ द्या की, असा सल्ला पाटील यांनी देत आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाच्या घेतलेल्या शपथेवरही टीका केली.
Web Title: BJP state President Chandrakant Patil lashes Chief Minister Uddhav Thackeray.
