परभणी : संपूर्ण देश आणि प्रसार माध्यम आज सलमान खानच्या २० वर्ष जुन्या काळवीट प्रकरणात हरवला आहे. पण केवळ २० व्या वर्षी देशासाठी लढणारा शहीद शुभम मुस्तापुरे माध्यमांच्या ठळक बातम्यांमध्ये नसल्याचे बघून महाराष्ट्रानामाच्या संपूर्ण टीमला दुःख होत आहे. देशाच्या सीमेवर देश रक्षणासाठी लढता लढता शहीद झालेला परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे सुपुत्र आहेत. अवघ्या विसाव्या वर्षी हा महाराष्ट्राचा वीर देशाचं रक्षण करता करता भारत मातेच्या कुशीत सामावून गेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शोकाकुळ वातावरण आहे.

आज शहीद शुभम मुस्तापूरे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक हजारो नागरीक उपस्थितत शुभम मुस्तापुरे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. लष्काराचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.

म्हणूनच म्हणतो, शहीद शुभम मुस्तापुरे आम्हाला तुम्ही महत्वाचे…. सलमान खान नाही ! तुमच्यासारखे वीर सुपुत्र देशाच्या सीमेवर आहेत तो पर्यंत हा देश सुरक्षित आहे. अभिमान आहे आमच्या टीमला की तुझ्यासारखा वीर सुपुत्र या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आला. परमेश्वराच्या कृपेने तुझ्या आत्म्याला शांती लाभो.

Obsequies done martyr shubham mastapure