नवी दिल्ली, २४ सप्टेंबर: देशात कोरोनाचे नव्यानं संसर्ग होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही आकडेवारी थोडी कमी असल्याचं आणि रिकव्हरी रेट चांगल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या नवीन आकडेवारीनुसार २४ तासांत ८६ हजार ५०६ लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून देशात आतापर्यंत कोरोनाचा आकडा ५७ लाखावर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ५०८ नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली असून, २४ तासांत १,१२९ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर १.५९ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे.

 

News English Summary: India’s Covid-19 case tally crosses 57-lakh mark with a spike of 86,508 new cases and 1,129 deaths in last 24 hours. The country now has 9,66,382 active cases, 46,74,988 patients have been either cured/discharged or have migrated and 91,149 people have died of the virus. Stay tuned for all latest updates.

News English Title: Indias Covid 19 case tally crosses 57 lakh mark with a spike of 86508 new cases Marathi News LIVE latest updates.

देशातील मृतांची संख्या लाखाच्या जवळपास | 24 तासांत 1,129 रुग्णांचा मृत्यू