मुंबई : देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला १० जागांपैकी तब्बल ९ जागांवर पराभव झाल्याने २०१९ मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यास मला आवडेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी दिली आहे.

सामान्य नागरिकांच्या मनात भाजप विरोधात रोष वाढत असून सामांन्यांच्या त्या भावनांचा आदर करत देशातील सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं असं मत पवारांनी मांडल आहे. त्यांना एकत्र आणण्यास मला नक्की आवडेल असं सुद्धा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं.

देशभरातील सामन्यांची धगधग पाहता भाजविरोधात एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे पवार म्हणाले. आधी म्हणजे १९७७ मध्ये सुद्धा एका पक्षाचा पडता काळ होता आणि त्यामुळे त्याचं सरकारसुद्धा कोसळलं होत. जर विरोधक एकत्र आले तर, तशीच परिस्थिती आता सुद्धा निर्माण होऊ शकते असं पवारांनी आवर्जून सांगितलं.

NCP Chief sharad pawar says i would love to bring all the opposition together against the bjp for upcoming election