29 April 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

अंधेरी पूल दुर्घटना: जीवन ज्योत प्रतिष्ठाणचा रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या 'त्या' कामगारांना मदतीचा हात

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना घडल्यानंतर अनेक कामगार रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी भर पावसात राबताना दिसत आहेत. परंतु त्यात आता माणुसकीच दर्शन घडविणाऱ्या घटना सुद्धा दिसू लागल्या आहेत. भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी मुरजी पटेल यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठाण या समाजसेवी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.

भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी जीवन ज्योत प्रतिष्ठाणने खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पुरविल्या आहेत. दिवसभर मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून त्यात भर म्हणजे अनेक व्हीआयपी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देत असल्यामुळे, प्रत्यक्ष ठिकाणी राबणाऱ्या कामगारांकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. परंतु प्रत्यक्ष घटनास्थळाच्या भेटी दरम्यान भाजपचे नगरसेवक असलेले मुरजी पटेल यांच्या ते निदर्शनास येताच, त्यांनी पुढाकार घेऊन त्या कामगारांना जीवन ज्योत प्रतिष्ठाण तर्फे मोफत खाण्यापिण्याच्या वस्तूंची त्याच ठिकाणी सोया करून दिली, तेव्हा कामगारांचा जीव भांड्यात पडला असं दिसत होत.

दुर्घटना घडली असली तरी सध्या ही वेळ रेल्वेसेवा लवकरात लवकर पूर्ववत कशी करता येईल हे महत्वाचे आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांचा खोळंबा होणार नाही आणि आजचा दिवस जरी मुंबईकरांना खूप दगदगीचा गेला असेल तरी लवकरात लवकर रेल्वेसेवा पूर्ववत कशी करता येईल यावर प्रशासनाचा भर आहे. कारण उद्या मुंबईकर पुन्हा आपल्या दैनंदिन कामासाठी पुन्हा घराबाहेर निघेल आणि त्याआधी रेल्वेसेवा पूर्ववत होणे गरजेचे आहे. अशावेळी जीवन ज्योत प्रतिष्ठाण सारख्या समाजसेवी संस्थेचा खारीचा वाटा सुद्धा महत्वाचा ठरतो.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x