नाशिकमध्ये आम्ही केलेला विकास भाजप स्मार्ट सिटीच्या नावाखाली दाखवत आहे : राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी संबोधीत करताना शहरातील अनेक गंभीर विषयांना हात घातला.
दरम्यान राज ठाकरे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, राज्यातील प्रत्येक शहराकडे पाहून वाईट वाटत असून देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही. प्रत्येक पक्ष स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असेल तर निवडणूक लढवून करायचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर बोलताना नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा लक्ष केलं. देशात १९८४ मध्ये काँग्रेसला म्हणजे राजीव गांधींना आणि त्यानंतर तब्बल ३० वर्षांनी नरेंद्र मोदींना बहुमत मिळाले. पण बहुमत मिळाल्यानंतरही काय केले? तर नोटाबंदी केली. बहुमत मिळाल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. विशेषम्हणजे ज्या व्यापा-यांनी मोदींना सत्तेवर आणलं, त्याच व्यापाऱ्यांची मोदींनी पहिली वाट लावली.
नाशिकमध्ये मनसेने सत्ताकाळात केलेल्या विकासकामांचा उजाळा देताना राज ठाकरे म्हणाले की, स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, आम्ही नाशिक दत्तक घेणार, परंतु नंतर तिकडे फिरकले सुद्धा नाही. नाशिक शहरात विकास आम्ही केला आणि भाजप सरकार स्मार्ट सिटीच्या नावाखाली, आम्ही केलेली कामे दाखवत आहेत. लाख कोटी रूपयांच्या कामांच्या भाजपचे मंत्री घोषणा करतात, पण त्यांच्या मंत्र्यांना कागद पेन दिल्यास तो सांगत असलेला आकडा लिहिता सुद्धा येणार नाही. भाजप पक्ष केवळ काँग्रेसच्या नावाने बोंबा मारतात आहे, पण स्वत:चं काय? दुस-यांची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात भाजपाला काय आनंद वाटतो तेच कळत नाही, असे मनसे अध्यक्ष खोचक पणे म्हणाले.
दरम्यान, पाणी फाउंडेशनच्या कामाचा हवाला देताना राज ठाकरे म्हणाले की, पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा पाणीप्रश्न एकटे सरकार सोडवू शकत नाही, त्यासाठी लोकसहभाग हवा. लोकसहभागच हवा असेल तर सरकार हवे कशाला? अशी टीका राज ठाकरे यांनी केली.तसेच इतर पक्षातून उमेदवार आयात करून तो निवडून आल्यास तो भाजपाचा विजय कसा? असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. इतर राज्यातील लोक येऊन तुमचे रोजगार बळकावत आहेत आणि सर्वच शहरांमध्ये मराठी माणसांचे प्रमाण कमी होत आहे. तेच इतर राज्यातील लोक येऊन स्वत:चे मतदारसंघ तयार करतील आणि निवडणूक जिंकतील. आपण काय करतो आहोत? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या