नवी दिल्ली : आपचे नेते तसेच दिल्ली’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विकास कामांच्या मुद्यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट रामलीला मैदानावर खुल्या चर्चेचे आवाहन दिल आहे. देशातील पूर्वांचलच्या भागात विकासासाठी मोदी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये अमित शहांनी मांडला होता त्याला केजरीवाल यांनी खुलं आवाहन देत, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ दे असं म्हटलं आहे.
दरम्यान, वित्त आयोगाच्या अंतर्गत मिळणाऱ्या निधीवर बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, काँग्रेस सरकारने १३ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पूर्वांचलच्या विकासासाठी केवळ ४ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तर नरेंद्र मोदी सरकारने मात्र १४ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ही रक्कम जवळपास तिप्पट करुन १३ लाख ८० हजार कोटी रुपयांचा निधी पूर्वांचलसाठी दिला असा दावा शहांनी केला होता. नेमका याच मुद्याचा आधार घेत १४ व्या वित्त आयोगांतर्गत दिल्लीला केवळ ३२५ कोटी रुपयांचा निधी का दिला, असा प्रश्न केजरीवाल यांनी अमित शहां पुढे उपस्थित केला आहे.
त्यानंतर ज्या विकासाचा धिंडोरा भाजपला वाजवला आहे, त्याच भाजपच्या विकासाला केजरीवाल यांनी खुलं आवाहन देत आप’ने केलेली विकास कामं आणि भाजपने केलेली विकास कामं यावर रामलीला मैदानावर खुली चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी अमित शहा यांना दिल आहे.
ट्विट’वर भाजपने केजरीवाल यांना उत्तर दिल आहे की,’केजरीवालजी, या ४ वर्षांत तुम्ही दिल्लीकरांसाठी काय काम केले? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एकच मूलमंत्र आहे. खोटे बोलणे आणि वारंवार रेटून खोटे बोलणे,’ असे टिष्ट्वट भाजपने केले होते. तर भाजपला प्रत्युत्तर देताना केजरीवालांनी आरोग्य, शिक्षण, वीज-पाणी या क्षेत्रात आप’च्या सरकारने केलेल्या मूलभूत कामांचा दाखला दिला आहे. तसेच आपच्या या कामांची प्रशंसा जागतिक स्तरावरही होत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
अमित जी, आपने तो हमारी हस्ती मिटाने की बहुत कोशिश की पर ऊपर वाला हमारे साथ है। बताइए, कब और कहाँ डिबेट करेंगे? https://t.co/cJKDAWEW9h
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 23, 2018
