मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची सर्व मालमत्ता आणि बँक खाती सील झाल्याने त्याच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार, कारण तसा इमेलच त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आणि ईडीने नीरव मोदींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केल्यामुळे मी तुमचे पगार देण्यास देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही नवीन नोकरी शोधावी असा थेट ईमेलच त्याने कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे.

पीएनबी बँक प्रकरण जेव्हापासून सार्वजनिक झाले आहे, तेव्हापासूनचा वेगाने घडणाऱ्या घडामोडींचा कल पाहता निष्पक्ष तपास होईल का याबाबतच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. कारण घोटाळा जरी ११,३५० पेक्षा मोठा असला तरी त्यात गुंतलेल्या मोठ्या व्यक्तींची नावे आणि इतिहास पाहता हे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

या घोटाळ्यात मात्र निष्पाप लोकांचेच बळी आधी जाऊ लागले आहेत आणि हे कर्मचारी सुध्दा त्यातलाच एक भाग आहेत असे बोलले जात आहे. परदेशी पलायन केल्यानंतर नीरव मोदींचा हा दुसरा ई-मेल आहे जो त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे. पहिला ई-मेल त्याने पीएनबी बँकेला पाठवला होता.

Nirav Modi email to employees to search a new job