Lok Sabha Election | मुंबईत तिसऱ्या बैठकीच्या तयारीत असलेली INDIA आघाडी आपली ताकद आणखी वाढवण्यात गुंतली आहे. पाटण्यातील पहिल्या बैठकीत १८ पक्ष होते आणि बेंगळुरूयेथील बैठकीत हा आकडा २६ पर्यंत पोहोचला आहे. आता INDIA आघाडी आपल्या आघाडीचा विस्तार करून एकेकाळी भाजपसोबत असलेल्या पक्षांना जोडण्याच्या तयारीत आहे.
पंजाबमध्ये अकाली दल आणि हरयाणात इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) हे हे पक्ष आहेत. नितीशकुमार यांनी अकाली दल आणि इनेलोशी संपर्क साधून त्यांना मुंबईतील बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिल्याचे समजते. इंडियन नॅशनल लोकदल आणि अकाली दल यांच्यात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.
याचे कारण म्हणजे ओमप्रकाश चौटाला आणि बादल कुटुंबीयांचे जवळचे राजकीय संबंध आहेत. अशा परिस्थितीत अकाली दल आणि इंडियन नॅशनल लोकदल एकत्र आले तर नवल वाटू नये असं म्हटलं जातंय. हे दोन्ही पक्ष यापूर्वी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचा भाग होते. इतकंच नाही तर हरयाणात ही शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू असल्याचं वृत्त आहे. 25 सप्टेंबर रोजी चौटाला यांचे वडील आणि माजी उपपंतप्रधान देवीलाल यांची जयंती आहे. यानिमित्ताने कैथल जिल्ह्यात एका मोठ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. तेजस्वी यादव आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल हेही यात सहभागी होणार आहेत.
मुंबईच्या बैठकीपूर्वी नितीशकुमार काय म्हणाले?
रविवारी नितीशकुमार म्हणाले होते की, मुंबईच्या बैठकीत आणखी काही पक्ष आमच्यासोबत असतील. शेतकरी आंदोलनादरम्यान अकाली दलाने भाजपशी फारकत घेतली होती. इतकंच नाही तर पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत दोघांमध्ये एकजूट झाली नाही. अकाली दलाने बसपासोबत युती करून निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश आले नाही. सुखबीर बादल आणि प्रकाशसिंग बादल यांच्यासारख्या नेत्यांनाही आपल्या जागा गमवाव्या लागल्या. अशा परिस्थितीत अकाली दलालाही सोबतीची गरज आहे, त्यांना INDIA कसं एकत्र आणणार ते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
News Title : Lok Sabha Election INDIA Alliance with more partners check details on 30 August 2023.
