वाराणसी : पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वारणसीमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. काँग्रेसने वाराणसीतून प्रियंका गांधी यांना नाही तर अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ निवडणुकांमध्ये मोदींविरोधात अजय राय रिंगणात उतरले होते.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. कॉंग्रेसने वाराणसीमधून प्रियंका गांधी यांना नाही तर अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. प्रियंका गांधी वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे राहणार असल्याच्या चर्चांना उधाणं आले होते. यावर आज पूर्णविराम लागला आहे. वाराणसी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा महाआघाडीत झालेल्या जागावाटपानुसार वाराणसीची जागा समाजवादी पक्षाला देण्यात आली आहे. याचबरोबर नुकतचं ‘काँग्रेस अध्यक्षांनी मला सांगितले तर वाराणसीतून निवडणूक लढवण्यास मला आवडेल’ असे प्रियंका गांधी यांनी म्हटल्यामुळे या चर्चांना उधाणं आले होते. वाराणसीत सातव्या टप्प्यात म्हणजेच १९ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी मोदी उद्या म्हणजेच २६ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत.
Congress Central Election Committee announces the next list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha from Uttar Pradesh. pic.twitter.com/zyol8wPd06
— Congress (@INCIndia) April 25, 2019
