पाटणा : मागील रविवारी संपलेल्या मतदानानंतर ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले आणि देशभरातील विरोधकांनी निरनिराळी विधानं करण्यास सुरुवात केली आहे. जाहीर झालेल्या सर्वच पोल्समध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात यावेळी देशभरातील वृत्त वाहिन्यांनी केला आहे. यामुळे सत्तेत येण्याची आस लावून बसलेल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झालाय. त्यामुळे बिथरलेल्या बिहारच्या नेत्याने चक्क शस्त्रच हातात घेण्याचं आवाहन केलं.

‘एक्झिट पोल’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भुमिका स्पष्टकरण्यासाठी पाटण्यात आज पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी सर्व एक्झिट पोल हे खोटे असल्याचं सांगितलं. पहिले बुथ लुटण्यात आले, आता निकालांची लूट करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. अशा वेळी गरज पडली तर महाआघाडीच्या नेत्यांनी शस्त्र हातात घेण्यास मागेपुढे पाहु नये असं आवाहनही त्यांनी केलं.

VIDEO : ‘एक्झिट पोल’ आणि ईव्हीएम’वरून थेट शस्त्र आणि रक्तपाताची भाषा