बारामती : पुढील वर्षी केंद्र कारकरने साखर उद्योगाला म्हणजे उसाला ठरवून दिलेला देण साखर कारखान्यांना शक्य होणार नसल्याने पुढील वर्ष साखर उद्योगासाठी संकटच राहणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे.
देशभरात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरी जगभरात साखर उद्योगाची बाजारपेठ मंदावली आहे त्यामुळे पुढचं वर्ष साखरेला २५०० पर्यंत इतकाच दर मिळेल असं शरद पवार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. जगातील प्रमुख साखर उत्पादक दशांनी गरजेपेक्षा जास्त उत्पादन घेतल्यामुळे साखरेसाठी बाजारपेठ मंदावली आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम साखर उद्योगांना भोगावे लागत असं शरद पवार म्हणाले.
भारतात शेतीविषयक संशोधन आणि शेतकऱ्यांच्या जोरावर भारताने साखर आयात करणारा देश अशी ओळख मिटवून एक साखर निर्यात करणारा देश म्हणून ओळख बनवली आहे. परंतु अशा कठीण परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे शरद पवार म्हणाले. बारामतीत एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात शरद पवारांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद केला.
