25 April 2024 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

धक्कादायक! फडणवीस सरकारच्या काळात राज्यात जातीय तणाव वाढला: पोलीस खात्याचा अहवाल

Hindu Muslim Riots, dalit riots, CM Devendra Fadanvis, Hindu Violence

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जातीय तणावाचा धक्कादायक अहवाल पोलीसांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची गोची झाल्याचं म्हटलं जातं आहे आणि विशेष म्हणजे स्वतः फडणवीस यांच्याकडेच गृहखातं असल्यामुळे अडचणीत अधिकच भर पडली आहे. दरम्यान पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणाव वाढलं असल्याच समोर आलं आहे. त्यानुसार हिंदु-मुस्लिम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचं दिसत आहे.

त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील भीषण परिस्थितीचं वास्तव उघड्यावर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने निवडणूक आयोगाला थेट राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरणच केल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगाला दिला.

या अहवालानुसार, हिंदू-मुस्लीम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील ८ जिल्हे संवेदनशील आहेत. तर त्या तुलनेत सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव असलेले १४ जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदशील आहेत. तर मागील काही वर्षात राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव राज्यात वाढला आहे.

त्यामुळे सर्वत्र सुशासनाचा जागावाज करणारं फडणवीस सरकार तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस खात्यानेच हा अहवाल दिल्याने विरोधकांच्या हाती आयतंच काहीतरी चालून आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x