मुंबई, २९ जून | राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोडी घडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री दाखल झाले आहेत. शरद पवारांपूर्वी परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहचले होते. दरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. संध्याकाळी 6.45 च्या सुमारास शरद पवार वर्षा बंगल्यावरुन सिल्व्हर ओककडे रवाना झाले.

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीतील महत्वाचे मुद्दे;

* महामंडळ वाटप विषय तात्काळ मार्गी लागावा.

* कोव्हिड निर्बंधाबाबत अन्य राज्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. सततच्या निर्बंधामुळे सर्वसामान्य जनतेत आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. राज्याची आर्थिक घडीही विस्कटते आहे.

* विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता फार चालढकल करू नये. आपण ही निवडणूक जिंकू, चिंता नको.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Meeting between NCP president Sharad Pawar and CM Uddhav Thackeray news updates.

पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा | कोणत्या मुद्यावर चर्चा?