1 May 2025 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

कोल्हापूर-सांगलीकरांना सावरायला ६ महिने जातील; त्यांच्यासाठी अधिक वेळ घ्या; निवडणूक पुढे ढकला

MNS, Raj Thackeray, Amit Thackeray, State Assembly Election 2019, Sangali Flood, Kolhapur Flood, Election Commission of India

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.

सध्याच्या परिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांची घरदार आयुष्यच नष्ट झाली आहेत आणि ती परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी ६ महिने लागतील. तसेच पूर जरी ओसरला तरी मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली आणि विषयाचे गांभीर्य प्रसार माध्यमांच्या समोर मांडले. अशा परिस्थितीत तिथली लोकं अडकली असताना त्यांच्याकडे मत जाऊन मागायची का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या याच विषयाला अनुसरून सुरु असलेल्या मार्केटिंग आणि राजकारणाचा देखील त्यांनी समाचार घेतला. विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘सरकारला हा पूर परिस्थितीचा अंदाज आला नव्हता आणि त्यामुळे मदत पोहोचण्यास सुरुवात झाल्याचे’, त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले होते. नेमका त्याच विषयाचा धागा संदर्भ घेत राज ठाकरे म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटलांना पूर परिस्थितीचा अंदाज येत नाही, मात्र कोणत्याही निवडणुकीत किती जागा निवडून येणार याचा त्यांना अचूक अंदाज येतो’ असा टोला लगावला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या