महत्वाच्या बातम्या
-
सारखं सरकार पडणार म्हणतात | मोकळी भांडीच खूप आवाज करतात - सुप्रिया सुळे
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र मागील एक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे दिल्ली ते गल्लीतील नेते महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याच्या गर्जना करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील अनेक नेत्यांनी तर थेट तारखादेखील जाहीर केल्या होत्या. मात्र दुसरीकडे भाजपचेच नेते मोठ्या संख्येने पक्ष सोडून महाविकास आघाडी पक्षातील एखाद्या पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी देखील विरोधकांची खिल्ली उडवत स्वतःचे कार्यकर्ते टिकविण्यासाठी भाजपचे नेते अशा सरकार पडण्याच्या बाता मारत असतात असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुप्रीम आणि हायकोर्टाला सुद्धा हे 'महाराष्ट्रद्रोही' ठरवणार का? | फडणवीसांचा सवाल
‘एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही’ ठरविणार का?, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
KDMC निवडणूक | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनीच केली निवडणूक एकत्र लढविण्याची घोषणा
कोरोनाने पुन्हा जोर धरलेला असताना राज्यात महत्वाच्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातील एक महत्वाची महानगरपालिका म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका म्हणावी लागेल. राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
टाळ्या, थाळ्या वाजवून, दिवे लावून कोरोना जाण्याऐवजी वाढला - जयंत पाटील
कोरोनाच्या साथीची दुसरी लाट आलेल्या युरोपला पुढच्या सहा महिन्यांत खडतर स्थितीचा सामना करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे (World Health Organization) संचालक हान्स क्लूग यांनी सांगितले. नागरिकांनी नीट दक्षता न घेतल्यास साथीचे संकट आणखी गडद होऊ शकते असेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
वाढीव वीजबिल | मनसेचा महामोर्चा | ठाण्यात उद्धव ठाकरे हाय-हाय घोषणाबाजी
वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली (MNS party Protest against High Electricity Bills) असून आज (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी | मनसेचा महामोर्चा | वीजबिलावरून सरकारला शॉक
वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली (MNS party Protest against High Electricity Bills) असून आज (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते | आडवे येणाऱ्यांना आडवं करून....
‘आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते. आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. हा इशारा नेमका कोणासाठी आहे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी आता चर्चेला उधाण आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचं आंदोनल 'हायजॅक' करण्याचा राजकीय डाव? | भाजपाची थेट नैतृत्वाची तयारी
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर २०२० नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा ठाकरे सरकारनं निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभुमीवर आता मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केलाय, असे विनोद पाटील म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात | आता कायदेशीर लढाई लढणार - विनोद पाटील
मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आम्ही संयम ठेवला पण अन्याय सहन करण्याची भूमिका आमची नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे असा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु होणार | दोन दिवसांत अध्यादेश
मराठा आरक्षणामुळं रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कराड येथील प्रीती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
कार्यकर्ते आणि आमदार सोबत राहावेत | म्हणून सरकार पडण्याचं गाजर दाखवावं लागतं - उपमुख्यमंत्री
राज्य सरकार पडणार आहे हे प्रमुख विरोधी पक्षांना वारंवार बोलावच लागतं. 1995 ते 99च्या काळात आम्ही एकूण 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार पलटवार केला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला खिंडार | माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र तसेच राज्यात मंत्री पद भूषविणारे नेते देखील भाजपाला सोडचिट्ठी देत असल्याचा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला एका माजी केंद्रीय पद भूषविणाऱ्या नेत्याने रामराम ठोकला होता आणि त्यामुळे भाजपाची चिंता कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.
5 वर्षांपूर्वी -
दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार असल्याचं माहिती नव्हतं | त्यांचा हा गुण माहिती नव्हता - पवार
दरम्यान शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही | म्हणून केंद्रातील सत्तेचा गैरवापर - शरद पवार
ठाण्यातील आमदार आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक (shiv sena mla pratap sarnaik) यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय (ईडी)च्या टीमने छापा टाकला आहे. (raided by officials of enforcement directorate) तसंच प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दमछाक होतं कसेबसे नवव्या फेरीत जिंकून आणि लॉटरी लागून झालेले आमदार - मंत्री सतेज पाटील
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लॉटरी लागून निवडून आलेले होते. कारण, आठव्या नवव्या फेरीमध्ये त्यांना विजय मिळाला होता अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि जयंत साळगावकर यांच्या प्रचारासाठी मंत्री सतेज पाटील हे पंढरपूरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस येईपर्यंत शाळा-कॉलेज बंद ठेवा | 10वी, 12वी परीक्षांचा पॅटर्न बदला
मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षाअखेरपर्यंत शाळा बंदच राहतील.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | अन्यथा....राज्य सरकारकडून पुन्हा निर्बंध लावण्याचे संकेत
कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचं उदाहरण दिलं होतं. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही | पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा असा होतो
“देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
4 खासदार असणारे लोकनेते | मग 303 खासदार असणाऱ्या मोदींच्या नेतृत्वला काय म्हणाल
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. तर ज्या पक्षाचे 4 खासदार आहे त्यांना लोकनेते म्हणताय मग 303 खासदार निवडून आणणाऱ्या मोदी यांच्या नेतृत्वाला काय म्हणायचे’ असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फसलेल्या 'मी पुन्हा येईन' टीमला पहिल्या वर्धापनदिनी माझ्याकडून श्रद्धांजली | खोचक ट्विट
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर याचं पारायण झालं नसेल. त्यावर स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ बद्दल खुलासा केला होता.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL