महत्वाच्या बातम्या
-
VIDEO - सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता म्हणजे शंकर पवार; राऊतांकडून नाव उघड
सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात २७३९ नवे कोरोना रुग्ण, १२० मृत्यू
राज्यात आज दिवसभरात २७३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २२३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३७ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट जुलैमध्येच सुरू होणार, आहार संघटनेचं स्पष्टीकरण
महाराष्ट्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी पण राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी जुलै महिना उजाडेल, असे
5 वर्षांपूर्वी
‘आहार’ संघटनेने स्पष्ट केले आहे. हॉटेल व्यवसायातील ८५ ते ९० टक्के कर्मचारी आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे ते परत येईपर्यंत आणि यासंदर्भातील अन्य व्यवस्था पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे ‘आहार’ चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे. -
यंदा शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणानेच
दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे घरातचं हा सोहाळा साजरा करण्याचं आवाहन खासदार छत्रपती संभाजी भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तसंच नागरिकांना गतवर्षीचाच सोहळा सकाळी ९ वाजता दाखवणार असल्याचं खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील नुकसानाची पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही - निलेश राणे
बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
5 वर्षांपूर्वी -
रायगडसाठी १०० कोटीचा तातडीचा निधी; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अलिबागचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची गरज ठळकपणे जाणवत आहे - उपमुख्यमंत्री
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउनमुळे सर्व नागरिकांना घरातच थांबावं लागले. त्यामुळे प्रदुषण तर कमी झालेच शिवाय… पक्षी आणि प्राण्यांना मोकळा श्वास घेता आल्याचं समोर आलं. मागील दोन महिन्यापासून देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. त्यामुळे गंगा नदीसारख्या अनेक नद्या स्वच्छ तर झाल्याच शिवाय मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरातील प्रदुषण कमी झाले आहे. प्राणी आणि पक्षांनीही त्यामुळे मोकळा श्वास घेतला.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वादळग्रस्त रायगडच्या दौऱ्यावर
कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जिल्ह्यांसाठी सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, अलिबाग या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात २९३३ नवे कोरोना रुग्ण, तर १२३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३ रुग्णांची भर पडली व १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सध्या ४१ हजार ३९३ एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रतिदिन १०,००० कोरोना चाचण्यांची क्षमता, मग फक्त ३५००-४००० चाचण्या का? फडणवीस
कोरोनाच्या चाचण्या मुंबईत कमी होत असून त्या वाढल्या पाहिजेत. राज्यात मृत्यूसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ तसेच मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक अथवा अन्य कारण नमूद करून अंत्यविधीसाठी मृतदेह दिले जात असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चाचण्यांचा वेगवाढवला तरच आपली कोरोनाच्या वादळापासून सुटका होईल, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाधित रुग्णाला एकच दिवस क्वारंटाइन ठेवलं; जमावाची मुख्याधिकाऱ्यावर चप्पलफेक
मुरगूड शहरात काल बुधवारी सापडलेला पहिला कोरोना बाधित २० वर्षीय रुग्ण हा प्रशासनाने कागदोपत्री संस्थात्मक क्वारंटाईन दाखवला आहे. पण प्रत्यक्षात हा रुग्ण केवळ एकच दिवस कन्या विद्यामंदिर या शाळेमध्ये क्वारंटाईन असल्याचे पुरावे देत नागरिकांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना पालिकेत जाऊन घेराव घातला.
5 वर्षांपूर्वी -
कोकणात चक्रीवादळाने आंबा, फणस, सुपारीच्या झाडांचं प्रचंड नुकसान
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात झालेले नुकसान पाहता आपण भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या पॅकेजची मागणी करणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत १,२७६, पुण्यात ३४० नवे रुग्ण, रुग्णवाढीचा दर ४.१५ टक्क्यांवर
एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे. देशात सर्वाधिक रूग्ण राज्यात असल्यामुळे कोरोनाचा प्रसार राज्यात कमी होणं गरजेचं होतं. गेल्या ७ दिवसांत राज्याचा सीडीजीआर म्हणजे रग्णवाढीची आकडेवारी ४.१५ टक्के होती. तर देशाचा सीडीजीआर ४.७४ टक्के होता. रूग्णसंख्या दुप्पट होण्याची आकडेवारीही १७.३५ दिवसांवर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चक्रीवादळ रोखण्यात राज्य सरकार अपयशी, भाजपचे शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनात, काँग्रेसचा टोला
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहिलं होतं. दुपारी १:३० वाजता चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरून जमिनीवर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अलिबाग मार्गे हे वादळ मुंबईत दाखल होणार होतं. त्यापूर्वीच वादळानं दिशा बदलली असून, चक्रीवादळ पनवेल, कर्जत खोपोली, नाशिक या मार्गे पुढे जाणार आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांच्या हवाल्यानं स्कायमेटनं हे वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये वादळाने पोल्ट्री फार्मचे प्रचंड नुकसान, कोंबड्या उघड्यावर
निसर्ग चक्रिवादळामुळे राज्यातील विविध ठीकाणी अनेक नुकसान झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले आहेत. या पार्श्र्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
वंचित पक्षातील माजी आमदार बळीराम शिरस्कर व हरिदास भदेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाराष्ट्र किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका असतानाच राजकीय वादळही पाहायला मिळाले. ‘वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग चक्रीवादळ: कार्यकर्त्यांना प्रशासनासोबत मदतीला उभे रहावे, पवारांच आवाहन
‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुस्थान युनिलीवर'कडून सरकारला २८, ८०० टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर्स, PPE किटस
कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात सुरूच असून एकूण 213 देशांना मोठा फटका बसला आहे.जगभरातील जवळपास 75 टक्के कोरोनाग्रस्त फक्त 13 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 48 लाखांवर पोहोचली.
5 वर्षांपूर्वी -
चक्रीवादळ: रायगड प्रशासनाने तब्बल १३,५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. यानंतर किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या.
5 वर्षांपूर्वी -
रत्नागिरी- भगवती बंदरात जोरदार लाटांमुळे जहाज भरकटले
निसर्ग’ चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळापूर्वी कोकण, मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रावर फेसाळलेल्या लाटांमध्ये जहाज भरकटले होते. जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने खवळलेल्या समुद्राशी जहाजाची झुंज सुरू होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER