22 September 2023 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर? Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी? Kajaria Ceramics Share Price | हा शेअर घेतला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 40337% परतावा दिला, किती कोटी परतावा मिळाला?
x

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट जुलैमध्येच सुरू होणार, आहार संघटनेचं स्पष्टीकरण

hotels and restaurants, Maharashtra, Open in July, Aahar association, Unlock

मुंबई, ६ जून: महाराष्ट्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी पण राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी जुलै महिना उजाडेल, असे
‘आहार’ संघटनेने स्पष्ट केले आहे. हॉटेल व्यवसायातील ८५ ते ९० टक्के कर्मचारी आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे ते परत येईपर्यंत आणि यासंदर्भातील अन्य व्यवस्था पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे ‘आहार’ चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे.

सध्या हॉटेलमध्ये जिथे १०० कर्मचारी होते. तिथे १० कर्मचारीही नाहीत. अशी परिस्थिती आहे. मूळगावी गेलेले कर्मचारी परत आल्यावर त्यांचे काही दिवस क्वारंटाईनमध्ये जातील. तोपर्यंत जुलै महिना उजाडेल. हॉटेल सुरू करायचे म्हटले तर पुरेशे मनुष्यबळ लागते. त्यामुळे सरकारने जरी परवानगी दिली तरी लगेच हा व्यवसाय सुरु करणे शक्य नाही असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान , हॉटेलचे कर्मचारी आणि ग्राहकांचे तापमान पाहणे , सॅनिटायझर देणे या गोष्टींचे पालन करता येईल. पण काही हॉटेल्स बारा बाय दहाच्या जागेत आहेत .तिथे सहा फुटांचे अंतर कसे ठेवणार असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या लॉकडाऊननंतर ‘पुनश्च हरिओम’ म्हणत निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ही शिथिलता आल्यानंतर पहिल्या महिन्याभरात जेमतेम १० टक्के लोक हॉटेलांमध्ये तर, २१ टक्के लोकच मॉलमध्ये शॉपिंगसाठी जातील. मात्र, सर्वाधिक ३२ टक्के लोक हे विविध ठिकाणची प्रार्थनास्थळे उघडण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर ‘लोकल सर्कल’ या संस्थेने देशातील २५४ जिल्ह्यांतील ३२ हजार लोकांचे एक ऑनलाईन सर्वेक्षण केले आहे. त्यात हॉटेल, मॉल आणि प्रार्थनास्थळांत प्रवेश सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्याभरात तुम्ही तिथे जाल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. कोरोनाच्या दहशतीमुळे हॉटेल आणि मॉलमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढणार नाही, असे हा अहवाल सांगतो. त्यामुळे तिथल्या व्यवसायिकांसमोरील आव्हाने आणखी काही काळ कायम असतील, असेच भाकीत वर्तविण्यात आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेले ६६ टक्के पुरुष तर ३४ टक्के महिलांचा समावेश होता.

 

News English Summary: Even though the Maharashtra government has given permission, the month of July will dawn for the opening of hotels and restaurants in the state, the ‘Aahar’ organization has clarified. Eighty-five to 90 percent of the hotel business has moved to its hometown. Therefore, it will take time for him to return and other arrangements in this regard will be completed, said Shivanand Shetty, president of Aahar association News latest Updates.

News English Title: Now hotels and restaurants in the Maharashtra will start in July says Aahar association News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x