महत्वाच्या बातम्या
-
आ. रोहित पवारांकडून तब्बल ३६ जिल्ह्यांना मोफत सॅनिटायझरचा पुरवठा
कर्जत-जामखेडचे आमदार असलेल्या रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० हजार लीटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे. त्यासाठी बारामती ॲग्रोची मदत त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे हे सॅनिटायझर रोहित पवार मोफत पुरवत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
घटना गैरसमजुतीतून घडली; आपत्तीच्या काळात राजकारण करणे चुकीचे
आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे याठिकाणी करोन नियम करा, असा सल्ला राज्यसरकारला राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी पालघरचे राजकारण करणे चुकीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.ते फेसबुक लाईव्हद्वारे बोलत होते. पालघरला जे झाले त्याचा जो काही संबंध असेल तर त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पालघर प्रकरण आणि करोनाचा कोणताही संबंध नाही. पालघरचे राजकारण घडायला नको हवे होते, असेही ते म्हणालेत.
5 वर्षांपूर्वी -
४६६ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४,६६६ वर
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४ हजार ६६६ वर पोहचला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ४६६ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचे संकट थोपवण्यासाठी ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत ९ मृतांसह राज्यातील मृतांचा आकडा हा २३२ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: ३१ कोरोना रुग्णांपैकी १४ रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी
राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४८३ वर पोहोचली आहे. ही सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामध्ये भिवंडी १,कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, रायगड २, सातारा १, सोलापूर १, ठाणे २१, वसई विरार २२ अशी २८३ नवीन रुग्णांची वाढ झाली असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
पालघर नव्हे तर दादरा नगरहवेली-महाराष्ट्राच्या सीमेवर घटना घडली; हत्या प्रकरणी ११० जणांना अटक
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये - संजय राऊत
शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर घेण्याची मंत्रिमंडळाने शिफारस करुनही राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. यावरुन राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’, असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. असंविधानिकरित्या वागणाऱ्यांना इतिहास माफ करत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ९५ टक्के चाचण्या निगेटिव्हः उद्धव ठाकरे
पीपीई किटसह सर्व सुविधा डॉक्टरांना पुरवल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. पीपीई किट किंवा उपकरणांचा तुटवडा असल्याची सत्यता त्यांनी यावेळी मान्य केली. पण मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनी कोविड व्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी क्लिनिक सुरु ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील इतर डॉक्टरांनाही त्यांनी असे करण्याचे आवाहन केले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना चाचण्या गुजरातच्या दुप्पट; राजस्थान द्वितीय क्रमांकावर
पीपीई किटसह सर्व सुविधा डॉक्टरांना पुरवल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. पीपीई किट किंवा उपकरणांचा तुटवडा असल्याची सत्यता त्यांनी यावेळी मान्य केली. पण मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनी कोविड व्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी क्लिनिक सुरु ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील इतर डॉक्टरांनाही त्यांनी असे करण्याचे आवाहन केले.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: बच्चे कंपनीची ई-लर्निंग अर्थात ऑनलाईन अभ्यासाला पसंती; शाळांचे उपक्रम
करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला होता. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र परिस्थिती अधिकच चिघळल्याने शाळा आणि कॉलेजेस अनिश्चित काळासाठी म्हणजे पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये जमा करणार
कोरोनाने घातलेले थैमान पाहता देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने उद्योगधंदे, कामगारांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली आहेत. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता बांधकाम कामगारांना यातून दिलासा मिळणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी, २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
5 वर्षांपूर्वी -
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांकडून घरभाडे वसुली ३ महिने पुढे ढकला; सूचना प्रसिद्ध
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असून उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. या काळात अनेकांचे आर्थिक उत्पन्नही थांबले आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचीही भीती आहे. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्याने लोकांसमोर मोठं संकट उभं राहणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही घरभाडे भरणे कठीण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या लोकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयातून एक पत्रकच निर्गमित करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
६ महिन्याच्या बाळासमोर कोरोना पराभूत...डिस्चार्ज; वाढवला सामान्यांचा आत्मविश्वास
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आतापर्यंत ६० रुग्णांपैकी २० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मागील चार ते पाच दिवसात कल्याण-डोंबिवलीतील जवळपास ९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीत भाजप समर्थक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तर महाराष्ट्र सैनिक उतरले बचावात
महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात परराज्यातील मजुरांची गर्दी जमल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच भाजपसमर्थकांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे राजीनामा द्या, अशी मागणी करत #UddhavResign हा ट्रेण्ड चालवला होता. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना राज ठाकरे यांच्या मनसेच्या महिला पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांचा विश्वास वाढावा; कोरोनातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा प्रसिद्ध करा
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एक पत्र लिहिलं आहे. ‘कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत आणि आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. ह्याबद्दल ह्या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले. तसंच यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या संभाषणाविषयीही भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे: राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला कोरोनाची लागण
देशात करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोना मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. ही बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने हे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार मुंबई आणि परिसरासाठी एक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी एक अशा तज्ज्ञांच्या दोन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
११७ रुग्ण वाढल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २८०० पार
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा विळखा आणखी वाढत चालला आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे आणखी ११७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर पोहचला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. आज आढळलेल्या ११७ कोरोनाबाधितांपैकी ६६ रुग्ण मुंबईचे आहेत तर ४४ रुग्ण हे पुण्याचे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
१७ सरकारी तर १५ खाजगी VDRL लॅब्स; देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात
देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट असून येथील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे. राज्यात आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
...आणि राज आहे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपत्तीत सर्व एकत्र असल्याचा संदेश दिला
राज्यातलं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल पुन्हा जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
देशावर संकट असताना राजकारण करू नका; पवारांचा सबुरीचा सल्ला
कोरोनावर मात करताना सर्वांनी एकत्र राहुया, कोरोनावर मात करणं हे महत्त्वाचं असून राजकीय पक्षांनी राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. मंगळवारी वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी असल्याचंही पवार म्हणाले. कोणीतरी अफवा पसरवल्याने गर्दी झाली. वांद्र्यासारखा प्रकार पुन्हा घडू नये, संभ्रम वाढेल अशा सूचना करु नका असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN