महत्वाच्या बातम्या
-
भाजपमध्ये येणारे नेते साधुसंत नाहीत, पण क्लीनचीट'साठी मुख्यमंत्र्यांकडे 'वॉशिंग पावडर'
भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या भरतीवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ धुवून घेतो. पक्षात आल्यानंतर क्लीन चिट देतो. नंतर ते कामाला लागतात, अशी शेलक्या शब्दात खडसे यांनी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कोकणाकडे निघालेल्या गणेशभक्तांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि त्यातच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडपाले गावाजवळ एक एसटी बस जळून खाक झाली. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावला असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
घरकुल घोटाळा: शिवसेना नेते सुरेश जैन आणि एनसीपी नेते देवकरांसह ४८ आरोपी दोषी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री, शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वच आरोपींना दोषी ठरवले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने जैन, देवकर यांच्यासह सर्वच ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारनंतर जिल्हा न्यायालय सर्व दोषींची शिक्षा जाहीर करणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाजानदेश यात्रा: फडणवीसांच्या यात्रेत कार्यकर्त्यांची गाडी देशी रिचार्ज शिवाय सरकेना
मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा सध्या संपूर्ण राज्य पिंजून काढत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा या यात्रेद्वारे पिंजून काढण्याचे पक्ष पक्षाने समोर ठेवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेच्या वेळी अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळत आहे. अनेक संघटनेच्या नेत्यांना तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना स्थानबद्ध करण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन मतं विभागणीसाठी वक्तव्य? राज्याचं विरोधी पक्षनेते पद वंचित'कडे असेल: मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये पोहोचली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत राहिला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात असेल, असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलं.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये १५ दिवसात ५० हजार कंत्राटी कामगारांनी नोकऱ्या गमावल्या
जागतिक मंदीचा फास घटवून असून यामुळे राज्यातील अनेक कंपन्या आपले उत्पादन थांबवत आहेत. औरंगाबादेतही अनेक कंपन्यांनी आपले उत्पादन क्षमता कमी केली आहेत. पंधरा दिवस गेल्या पंधरा दिवसात जवळपास ५० हजार कंत्राटी कामगारांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशी माहिती कामगार नेते उद्धव भवलकर यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
धुळ्यात केमिकल कंपनीत स्फोट; ७ जणांचा मृत्यू
धुळेतील एका मोठ्या कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरपूर जवळच्या एमआयडीसी कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या भीषण स्फोटात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच या कंपनीत ७० जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या स्फोटामुळे शिरपूरजवळील गावे हादरली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
6 वर्षांपूर्वी -
पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारताच पत्रकार परिषदेत भडकले शरद पवार
मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीतून अनेक नेते पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामागोमाग चित्रा वाघ, मधुकर पिचड, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड अशा अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे तर सातारचे खासदार उदयनराजे भोसले, पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच एनसीपीला अनेक धक्के सहन करावे लागत आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा पेक्षा शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची कामगिरी चांगली: प्रजा फाउंडेशन अहवाल
राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या ३ आमदारांच्या यादीत भारतीय जनता पक्षाच्या एकाही आमदाराच्या नावाचा समावेश नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार असल्याचे प्रजाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल असून तिसऱ्या स्थानी मालाडचे आमदार अस्लम रमझान अली शेख यांचा समावेश प्रजाने आपल्या अहवालात केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राणेंचा भाजपप्रवेश हे युती 'न' होण्याचं निमित्त ठरणार?
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, मागील राज्यसभा निवडणुकीच्या वेळी नारायण राणे जर भाजपमध्ये गेले तर युती अवघड असल्याचा सांगणारी शिवसेना नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती; ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज; गावागावातून रेकॉर्डब्रेक अर्ज येण्याची शक्यता
महाराष्ट्रातील शहर आणि प्रत्येक गावामधून तरुण-तरुणी वाट पाहत महाराष्ट्र पोलीस दलातील मेगा भरतीची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती होणार आहे. दरवर्षी या पोलीस भरतीसाठी प्रत्येक गावातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या शहरांपासून ते गावांपर्यंत खाजगी नोकऱ्यांची भीषण परिस्थिती असल्याने या भरतीसाठी सर्वचजण तुटून पडणार असल्यास बोललं जातं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेत्यांचं खाणं-पिणं उत्तम सुरु; पण कुपोषणामुळे २ वर्षांत तब्बल ३५ हजार बालमृत्यू
कुपोषणमुक्तीसाठी सरकारच्या सर्व यंत्रणा संयुक्तरित्या प्रयत्न करत असून आता ही समस्या नियंत्रणात आल्याचा दावा सातत्याने सरकार करत असली तरीही तो दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारी २०१७ ते मार्च २०१९ या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये शून्य ते ५ वर्षे वयोगटातील ३५ हजार १८७ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यात शून्य ते एक वर्ष वयोगटातील २७ हजार ०९४ तर १ ते पाच वयोगटातील ८ हजार ०९३ मुलांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने आम्हाला १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावं: प्रकाश आंबेडकर
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अकोल्यात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेद घेतली. या पत्रकार परिषेद ते बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव वंचित बहूजन आघाडीने काँग्रेसला दिला आहे. निर्णयासाठी वंचितने ऑगस्ट अखेरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे असे ते म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
आमच्याकडील गुजरातच्या निरमा पावडरने आम्ही नेत्यांना पक्षात घेताना धुवून घेतो: दानवे
भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न एनसीपी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आणि भाजप पसरवत असलेला EVM चा अर्थ वेगवेगळा कसा?
ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले. दरम्यान, ईव्हीएम बाबत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असाच केला होता हा योगायोग.
6 वर्षांपूर्वी -
योगी आदित्यनाथांनंतर फडणवीसांचं विधान; ईव्हीएमचा अर्थ 'एव्हरी वोट फॉर मोदी'
ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले. दरम्यान, ईव्हीएम बाबत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असाच केला होता हा योगायोग.
6 वर्षांपूर्वी -
२००४ ते २०१४ दहा वर्ष तुमची सत्ता होती; तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? फडणवीस
ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचं सेनेविरुद्ध षढयंत्र; १२३ मतदारसंघ वगळता उर्वरित १६५ जागांवर उमेदवारांची यादी तयार
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेनेला जेमतेम १०० ते ११५ जागा देऊन इतर जागा भारतीय जनता पक्षाने आणि मित्रपक्षांच्या पदरात अलगद पडतील अशी रणनिती तर भाजपने आखली आहेच. शिवाय एवढ्या कमी जागा घ्यायला शिवसेना तयार न झाल्यास विधानसभेच्या सर्व जागा शिवसेनेशिवाय लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मित्रपक्षांना खूष करण्यासाठी त्यांना द्यावयाच्या काही जागांमध्ये ग्रामीण भागांबरोबरच मुंबईतील जागांचाही समावेश असल्याचे कळते.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक कर्जमुक्ती, पीक विमा, महिलांचे प्रश्न, दुष्काळमुक्त महाराष्ट्र मुद्यांवर लढणार: आदित्य ठाकरे
विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. युवा सेनाप्रमुख आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची भावना आहे. यावर सूचक मौन पाळत आदित्य मैदानात उतरले आहेत. आदित्य यांनी १८ जुलैपासून जळगावमधून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेद्वारे ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सध्या या यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून ती नागपुरात पोहोचली आहे.
6 वर्षांपूर्वी -
खरा हिंदू मी, हनुमान चालिसा, वेद-पुराण सर्व येतं; हिंदू आदित्य ठाकरेंना सांगा बोलायला
राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या राज्यभर शिवस्वराज्य यात्रा जोरदारपणे सुरु आहे. आमदार-खासदारांच्या फुटीकडे दुर्लक्ष करत पक्षाने संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. त्याचाच भाग म्हणजे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये सुरु होती, त्याला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात विशेष गाजलं ते अमोल मिटकरी यांचं तडाखेबंद भाषण, ज्यामध्ये त्यांनी भाजप शिवसेनेची पिसं काढली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH