26 April 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा
x

आमच्याकडील गुजरातच्या निरमा पावडरने आम्ही नेत्यांना पक्षात घेताना धुवून घेतो: दानवे

MP Raosaheb Danve, MP Supriya Sule

मुंबई : भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न एनसीपी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.

२०१४मध्ये सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस-एनसीपीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्यांच्यावर आरोप केले होते. त्याच नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतले जात आहे. हे डागाळलेले नेते आता सत्ताधाऱ्यांना कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीन धुतले जाते, असा सवाल एनसीपीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. सुळे यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत उत्तर दिले होते.

भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस, एनसीपीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत होते. लोकसभेआधी तर भारतीय जनता पक्षामध्ये मेगा भरती होती. परंतु, या भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना खुद्द आरोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष प्रवेश देत उमेदवारीचीही माळ गळ्यात घालत असल्याने भाजपवर टीका होत होती. यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस, एनसीपीच्या नेत्यांना पक्षात घेताना त्यांच्यावरील आरोपांची, गुन्ह्यांची पडताळणी करूनच घेत असल्याचे सांगितले होते. यावर एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अशी कोणती पावडर असल्याचे विचारले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे डॅशिंग रसायन असल्याचे उत्तर दिले होते. यावर सुळे यांनी या घातक रसायनापासून सावध रहा असा इशारा पक्षबदलू नेत्यांना दिला होता.

राज्यात युती असल्याने बहुतांश ठिकाणी शिवसेनेच्या वाट्याच्या जागांवर भारतीय जनता पक्षाने भरती चालविली होती. मात्र, या नेत्यांनी भाजपात घेताना त्यांना आमदारकीची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर नारायण राणेंसारखे अनेक नेते अद्यापही आश्वासन पूर्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनीच भरती थांबविल्याचे जाहीर केले होते.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x