महत्वाच्या बातम्या
-
नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, १३ नगरसेवक व अनेक पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तक्रारी होत्या खरीप विमा कंपनीच्या; उद्धव ठाकरेंचा मोर्चा 'रब्बी' विमा कंपनीवर
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वंचित आघाडी ३० जुलैला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार
लोकसभा निवडणुकीत केवळ एका जागेवर विजय प्राप्त करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आघाडीच्या सर्व चर्चांकडे दुर्लक्ष करत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच २८८ जागांवरील उमेदवारांच्या चाचपणी प्रक्रियेवरील जोरदार चक्र सध्या फिरताना दिसत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी एमआयएम’ने विधानसभेच्या तब्बल शंभर जागांची मागणी करत संभाव्य उमेदवारांची संपूर्ण यादीच प्रकाश आंबेडकरांकडे सुपूर्द केली होती.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: मतदार यादी दुरूस्ती व नोंदणी कार्यक्रम सुरू; अंतिम तारीख १९ ऑगस्ट
भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या छायाचित्र मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली असून दिनांक १९ ऑगस्ट २०१९ ही अंतिम तारीख असणार आहे. दरम्यान मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस नागपूर व मुंबई अशा २ मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता
राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच सर्वच पक्षातून नवनवीन बातम्या येत आहेत. विशेष करून भारतीय जनता पक्षात सर्वात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सूर केली केली आहे. त्यानुसार या विधानसभेला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील २ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाची राष्ट्रवादीला नोटीस; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या लाटेत काँग्रेस’सकट देशभरातील सर्वच विरोधकांचा सुपडा साफ झाला. मात्र त्यानंतर अनेक पक्षांचं राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखच धोक्यात आली आहे. लोकसभेतील पराभवानंतर आता निवडणूक आयोग देखील भारतीय जनता पक्षाच्या सर्व विरोधी पक्षांना धक्का देण्यास सज्ज झाला आहे असं म्हटलं जात आहे. इतर पक्षांप्रमाणे हा धक्का शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देखील बसणार आहे. कारण आयोगाने अनेक पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली आहे. अशा पक्षांमध्ये एनसीपीचा देखील समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजब! चंद्रकांत पाटील भाजप पक्ष काँग्रेसयुक्त करून, राज्य काँग्रेसमुक्त करणार?
महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे एकाच विषयावरील दावे नक्की काय सांगत आहेत ते सामान्यांच्या विचार शक्तीपलीकडील आहे. कारण कालच चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की राज्यातील अजून अनेक काँग्रेस आमदार भारतीय जनता पक्षात थेट आमदारकीचा राजीनामा देऊन प्रवेश करतील. तत्पूर्वी देखील अनेक काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेशकरून मंत्रिपदं खिशात घातली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
माढा संदर्भात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली अमित शहांची भेट
एनसीपीचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे राष्टीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अमित शहा यांच्या भेटी दरम्यान महाराष्ट्रात गाजत असलेल्या नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प, नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची प्रलंबित प्रश्नावर महत्वाची चर्चा झाल्याचं खासदार नाईक निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधक मनसेलाचं नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सोबत घेतील: संजय राऊत
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी सुरु झाली आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पायउतार करण्यासाठी कॉंग्रेसकडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी हालचाल केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने कॉंग्रेस आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
क्रॉफर्ड मार्केटमधील कोळी समाजाला पालिकेची स्थलांतराची नोटीस; कोळी समाज कृष्णकुंजवर
मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं समजतं.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत: नवनीत राणा
पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मागील दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पी. साईनाथांप्रमाणे उद्धव ठाकरेंनी थेट रिलायन्सचं इन्शुरन्सच नावं का घेतलं नाही?
पंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल विमान खरेदी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी कार्यकर्ते पी. साईनाथ यांनी नोव्हेंबर २०१८ मध्येच थेट जाहीर पत्रकार परिषदेत केला होता. त्यावेळी त्यांनी अनेक कंपन्यांची यादी जाहीर करत बक्कळ नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली होती. त्यात रिलायन्स इंशुरन्ससारख्या तब्बल १० कंपन्यांचा समावेश होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कसा घोटाळा किती मोठा आहे याच वास्तव त्यावेळी उघड झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
तेव्हा 'वाघ झोपला होता'; नेटिझन्सकडून सेनेच्या निवडणूकपूर्व 'इशारा मोर्चाची' खिल्ली
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होत असल्याने केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: शेतकरी मोर्चांना स्वतः ५ वर्ष भेट न देणारे उद्धव ठाकरे आज रस्त्यावर उतरणार
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होत असल्याने केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता?
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल काँग्रेस आणि एनसीपी दरम्यान बैठक पार पडली. या बैठकीत एकूण जागा वाटपा विषयी सविस्तर चर्चा झाली. दरम्यान यावेळी एनसीपीने विधानसभेसाठी एकूण जागांपैकी निम्म्या जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे आघाडीत बोलणी प्राथमिक स्तरावर असतानाच पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
'राजकीय' कंत्राटी भरती तरुणांना मोठ्या महाबेरोजगारीकडे घेऊन जाणार: सविस्तर
लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर विविध खात्यांच्या भरती संदर्भातील बातम्या वेगेने येताना दिसत होत्या. त्यानंतर असलेले उच्च पदावरील अधिकारी ते खालच्या पदावरील अधिकाऱ्यांना देखील नारळ देऊन त्याजागी खाजगी सेवेतील लोकांना नियुक्त करण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र शासनाने देखील एकावर एक अशा अनेक खात्यांच्या भरती सदंर्भातील बातम्या पेरण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर सर्वच गुदस्त्यात बांधलं गेलं.
6 वर्षांपूर्वी -
गडकरी म्हणतात आयुष्याभर टोल भरा; राज्यातले नेते म्हणतात दादांचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ
भारतीय जनता पक्षाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो असं धक्कादायक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होतं. सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केले होते.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र भाजपने नव्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले रावसाहेब दानवे सध्या दिल्लीच्या राजकारणात गेल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी वरानी लागली आहे तर मुंबई शहराच्या अध्यक्ष पदाची माळ मंगलप्रभात लोढा यांच्या गळ्यात पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
यवतमाळ अपहरणनाट्य: मास्टरमाईंड भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे गृहमंत्र्यासोबत फोटो
व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करून ५० लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा देखील समावेश असून शुभम टोलवानी असं त्याचं नाव आहे. क्रिकेटच्या सट्ट्यात पैसे हरल्यामुळे त्याने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून पैसे कमावण्याचा शॉर्टकट स्वीकारला होता आणि त्यात पुरता फसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्र, राज्य व पालिका हातात तरी 'मराठी भाषा भवन' बनता बनेना; पण हिंदी भाषा शाळांच्या भव्य इमारती
राज्यात मराठी अस्मितेचे राजकारण करणारी शिवसेना मराठी भाषा भवन मुंबईतच व्हावे यासाठी आग्रही असल्याचे दिसत नाही. बाकी इतरवेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा गळा शिवसेना काढत असते. मग मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना सत्तेत येऊन देखील गप्प का बसली आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे बोलताना सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मराठी भाषा भवन मुंबईबाहेर हलवू देणार नाही, यासाठी आग्रह धरला पाहिजे. मात्र शिवसेना फक्त मतांसाठी मराठीचा आणि मराठी माणसाचा वापर करते. मराठी भाषा भवनासाठी मुंबईत एक इमारत उपलब्ध करून देता येत नसेल तर शिवसेनेला मराठी-मराठी करण्याचा अधिकारच राहिलेला नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS