महत्वाच्या बातम्या
-
मुंडे समर्थकांमध्ये सुप्त सुनामी? | पंकजांच्या वाढदिवसानिमित्त मोठी बॅनरबाजी | भाजप नेत्यांना स्थानच नाही
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. परंतु, संबंधित बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्याच्या फोटोला अजिबात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील मुंडे समर्थक देखील राज्यातील भाजप नेत्यांवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विरोधक पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर | सरकार झोपलंय म्हणणाऱ्या दरेकरांच्या झोपेत डुलक्या
महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचं रौद्र रुप बघायला मिळालं. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. तर रायगड, सातारा जिल्ह्यासह काही ठिकाणी दरडी कोसळून मोठी जीवित हानी झाली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | अशोक चव्हाणांचं सर्वपक्षीय खासदारांना पत्र | 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्यासाठी मोहीम
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाड आपत्ती | पवारांच्या सूचनेनंतर आव्हाडांची घोषणा | पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली
महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शाळांचं 15% शुल्क कमी करा | कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करा | सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
आर्थिक गणित बिघडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिलेत. यावर 3 आठवड्यात आदेश देण्याचंही न्यायालयाने सांगितलंय. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना देखील दणका बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी गावरान झणझणीत लसूण खोबर चटणी बनवा - वाचा रेसिपी
झणझणीत लसूण खोबर चटणी हे ताटात असणं म्हणजे सोने पे सुहागा, ज्याचे नाव ऐकताच त्याच्या तोंडातून पाणी येते. आजच्या काळात हे एक लोकप्रिय खाद्य आहे जे रेस्टॉरंट्स मध्ये देखील अनुभवता येतं आहे. तथापि, घरांमधील महिला त्यांच्या स्वत: च्या स्टाईलमध्ये झणझणीत लसूण खोबर चटणी बनवतात. त्यात जर आपण आपल्या आहारात काही झणझणीत करण्याचा विचार करत असाल तर आपण झणझणीत लसूण खोबर चटणी बनवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
तळिये भूस्खलन | मुख्यमंत्री दरडग्रस्त तळिये गावात दाखल | तळिये दरडग्रस्तांचे पुनर्वसन करणार - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दरडग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या महाडजवळील तळिये गावाची पाहणी करत आहे. दरम्यान, त्यांनी दरडग्रस्त तळिये गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गावातील लोकांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार असून गावातील दरडग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
महाड तळिये दुर्घटना | राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पहिला टेम्पो महाडच्या दिशेने
राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहाणी झाल. दरम्यान, एनडीआरएफ पथकाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. काल महाडजवळील तळिये गावात मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये 35 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गडप झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०१९ मधील सांगली-कोल्हापुर महापुरावेळी फडणवीस महाजानदेश यात्रेत मग्न होते | भाजप नेत्यांना विसर - सविस्तर वृत्त
जोरदार पावसाने कोकणात हाहाकार माजवला आहे. महापुराने चिपळूण पार उद्ध्वस्त झाले. लोक अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत; मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा वेळी पालकमंत्र्यांनी तिथे थांबून जनतेला मदत करायला हवी. पण पालकमंत्री एका रात्रीत मुंबईला पळ काढतात. हे पालकमंत्री नाही, हे तर पळपुटे मंत्री आहेत, या शब्दात भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना टोमणा मारला.
4 वर्षांपूर्वी -
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता मोबाइल आचारसंहिता | काय आहेत कार्यालयीन वेळेतील नियम
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या वेशभूषेबाबत मध्यंतरी केलेल्या मार्गदर्शक सूचना वादग्रस्त ठरल्या होत्या. आता त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल वापराबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तळीये दरड कोसळून जीवितहानी | मुख्यमंत्री आज तळीये गावात गावकऱ्यांशी संवाद साधणार
काल अतिवृष्टी झाल्याने महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळली. दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली ३५ पैकी ३२ घरं गाडली गेली. कालपासून (२३ जुलै) तळीयेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. दुपारी ते गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह राज्य सरकार पाडण्याच्या प्लानचा भाग होते? | वाझेही संपर्कात होता | धक्कादायक जबाब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईत खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ठाण्यातही त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. धमकवल्याच्या प्रकरणासह अनेक कलमांन्वये त्यांच्या विरोधात परमबीर आणि अन्य वरिष्ठ पोलिसांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र परमबीर सिंग यांच्यामार्फत मार्च मध्ये म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी योजना आखली गेली होती अशी माहिती एक जवाबाबत समोर आली आहे. त्याच अधिवेशनात १० मार्च २०२१ ला विरोधी पक्ष नेत्यांनी तशीच भूमिका घेत पावलं उचलली होती का अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ज्याची माहिती राज्यातील आणि देशातील तपासयंत्रांना देखील नव्हती ती विरोधी पक्षनेत्याकडे कोणी पोहोचवली याची सूचक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
निसर्गाचा प्रकोप | तळई गावाची लोकसंख्या 241 | त्यापैकी 109 व्यक्ती सुदैवाने गावाबाहेर होत्या
कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाढली गेली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
प्रसार माध्यमांची गळचेपी | आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? - शिवसेना
दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आले दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. तसंच आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया देत, केंद्र सरकारवर घणाघात केला.
4 वर्षांपूर्वी -
Raigad landslide | ४४ मृतदेह काढले बाहेर | अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखालीच? | बचावकार्य सुरूच
आधी महाराष्ट्रावर आभाळ कोसळले अन् आता दरडी. आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार उडाला. रायगड, रत्नागिरी व साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले तसेच इतर दुर्घटना घडल्या. गेल्या ४८ तासांत सुमारे १२९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. दुर्गम भाग व पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तरुणांनो... स्वतःच्या CSC सेंटरसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल? | या आहेत स्टेप्स
भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे जो या माध्यमातून भारतातील प्रत्येक गावातून आधुनिक अश्या ऑनलाईन सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या महाराष्ट्रात राज्यमध्ये CSC (Common Service Centre) ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा या केंद्रातून दिल्या जातात.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात - शिक्षणमंत्री
मागील दोन वर्ष कोरोनाचा फटका देश तसेच राज्यातील शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊन आणि सरकारच्या कडक निर्बंधांमुळे बहुतांश भागात शाळा वर्षभरापासून बंद आहेत. परिणामी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असला तरी त्याला देखील अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात यंदाही २५ टक्के कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली | पुढचे 2, 3 दिवस कोकणात व मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
एकाबाजूला राज्यात मान्सूनच्या मुसळधार पावसानं हाहाकार मजला आहे. मुंबई वेधशाळेनं आज दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढचे 2, 3 दिवस, खास करून कोकणात व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, सोमवार पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही पूरग्रस्त भागात अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो | तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा- चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात पावसाचं थैमान | लोकांच्या मदतीसाठी राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना पत्र
राज्यात पावसाने थैमान घातलंय. आज महाराष्ट्राला हादरविणाऱ्या तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून 32 लोकांचा लोकांचा मृत्यू झालाय. साताऱ्यातल्या आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 लोकांचा मृत्यू झालाय. तर तिकडे चिपळूणमध्येही 17 घरांवर दरड कोसळून जवळपास 20 लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. याच विषयाला अनुसरून आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांना पुढे यावं, तातडीने जशी जमेल तशी मदत तरावी, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL