मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचं देशभर पानिपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हाती आलेल्या आकडेवारीनंतर काँग्रेसच्या अनेक जागा बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे पडलायचं दिसलं आणि काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसोबत जुळवून घेण्याच्या गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काँग्रेसचं पानिपत झालं आहे म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडी भाजपची ‘बी टीम’ आहे असा आरोप आमच्यावर केला गेला. याचे पुरावे अशोक चव्हाणांसह काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आम्हाला द्यावे, असं प्रकाश आंडेकरांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

वंचितवर केलेल्या आरोपांचे काँग्रेसकडे पुरावे नसतील तर त्यांनी आमच्या ४० लाख दुखावलेल्या मतदारांची माफी मागावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, ईव्हीएमवर संशय कायम असून याबाबत निवडणूक आयोगाची येत्या २५ तारखेला भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?  प्रकाश आंबेडकर