पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी २०१८ चा निकाल एकूण ८८.४१ टक्के लागला आहे. एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा म्हणजे ९४.८५ टक्के लागला आहे. तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८६.१३ टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदा सुद्धा मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९२.३६ टक्के असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ८५.२३ एवढे टक्के एवढं आहे.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल १ वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
