मुंबई: महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (२५ ऑक्टोबर) कृष्णकुंजवर बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरे निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत संवाद साधणार होते. त्यानुसार सकाळी ११ च्या दरम्यान सर्व उमेदवार कृष्ककुंजवर उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महारष्ट्र नवनिर्माण सेनेने एकूण १०५ ठिकाणी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. परंतु, यामधील फक्त एकाच उमेदवाराचा विजय झाला आहे. तर बाकी सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. २०१४ च्या निवडणुकीतही महारष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता.
राज्याच्या निवडणुकांमध्ये महारष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. परंतु अखेरीस राज ठाकरे यांनी आपले १०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. पण या निवडणुकीत त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. कल्याण ग्रामीणमधून महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील विजली झाले. पाटील यांच्या रूपात मनसेला केवळ एकच विजय मिळाला. २०१४ च्या निवडणुकीतही महारष्ट्र नवनिर्माण सेनेला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.
अनेक ठिकाणी महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी काँटे की टक्कर दिल्याचं पहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी तर महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पराभूत होऊनही दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पहायला मिळालं होतं. दरम्यान, राज ठाकरे आज सर्व उमेदवारांशी चर्चा करणार असून आत्मचिंतनही केलं जाणार असून २०२४च्या अनुषंगाने पक्ष पुन्हा कामाला लागू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
