20 April 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

वंचित'मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका

VBA, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, NCP, Congress, Balasaheb Thorat

मुंबईः लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस एनसीपीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-एनसीपीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-एनसीपी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती. लोकसभेत सोबत असलेला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबतही आंबेडकर यांनी ऐनवेळी युती तोडली. त्यामुळे राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा वंचितवर आधीपासूनच आरोप केला जात आहे. परंतु, हा आरोप वंचितच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा निवडणुकीत चांगल यश मिळवलेल्या काँग्रेस – एनसीपी आघाडीसोबत वंचितची आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे.

राज्यातील जवळपास ३२ जागांवर काँग्रेस एनसीपीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत. वंचितला मिळणारी ही सर्व मते काँग्रेस एनसीपीला मिळणारी मते असल्याचे बोलले जात आहे. वंचितने काँग्रेस एनसीपीसोबत आघाडी केली असती तर राज्यात आघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, हे आता निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांना वंचित आघाडीला पुढे करून जे काही करायचं होतं, ते करण्यात त्यांना यश आलं आहे,’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याचं या निकालातून स्पष्ट झालं. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला आणखी मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र काँग्रेसलाही समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-सेनेवर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव झाला नाही. काश्मीरमधील कलम ३७० यासारखे भावनिक मुद्दे चालले नाहीत. जनतेच्या समस्या सत्ताधारी भूमिका मांडण्यात कमी पडले. म्हणूनच त्यांच्या जागा घटल्या,’ अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x